एक्स्प्लोर

ठाण्यात एकाच दिवशी तिघांचा बुडून मृत्यू, एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोघे बुडाले, दोघांना वाचवले

एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू ठाण्यामध्ये झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन जण बुडाले आहेत. येऊर इथल्या नील तलावात सकाळी एक किशोरवयीन मुलगा तर संध्याकाळी एक तरुण बुडाला आणि त्यांचा मृत्यू झाला.

ठाणे : एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू ठाण्यामध्ये झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन जण बुडाले आहेत. येऊर इथल्या नील तलावात सकाळी एक किशोरवयीन मुलगा तर संध्याकाळी एक तरुण बुडाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर लोकमान्य नगर इथल्या मिलिटरी ग्राउंड जवळ असलेल्या मोठ्या खड्ड्यात एक तरुण बुडाल्याची घटना दुपारी घडली. मुख्य म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये बुडालेल्या व्यक्तीचाच हलगर्जीपणा आणि बेफिकिरी यांना भोवली असल्याचे समोर आले आहे. ठाण्याच्या अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी जाऊन तिघांचे मृतदेह शोधून ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. 

रविवारी सकाळीच एका किशोरवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना येऊर इथल्या नील तलावात घडली. प्रसाद पावसकर असे या सोळा वर्षांच्या मुलाचे नाव होते. नौपाडा पोलिस स्थानकात काम करणाऱ्या पोलीस हवालदार मधुकर पावस्कर यांचा तो मुलगा होता. सकाळी मित्रांसोबत साकेत इथे फुटबॉल खेळायला जातो असे सांगून प्रसाद आणि त्याचे पाच मित्र निघाले मात्र ते साकेत इथे न जाता येऊरच्या तलावात पोहण्यासाठी आले. प्रसादला पोहता येत नव्हते मात्र मित्रासोबत त्यांनी उडी घेतली. त्यावेळी त्याच्या डोक्याला पाण्यातील दगड लागून इजा झाली. तसेच त्याचा पाय पाण्यात असलेल्या दगडात अडकल्याने तो बाहेर पडू शकला नाही. दुसऱ्या मित्राला मात्र इतर सर्वांनी मिळून बाहेर काढले त्यामुळे तो वाचला. यामध्ये प्रसादचा दुर्दैवी मृत्यू झाला. मधुकर पावसकर यांना दोन मुलींनंतर आठ वर्षांनी प्रसाद रूपाने पुत्रप्राप्ती झाली होती. नवसाचा मुलगा म्हणून त्याला जीवापाड जपले जायचे. मात्र आज त्याच्याच चुकीमुळे त्याचा जीव गेला. 

त्याच येऊर इथल्या तलावात संध्याकाळच्या सुमारास राबोडी परिसरातील पाच ते सहा मित्र पोहायला गेले होते. त्यापैकी दोघांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मात्र त्यापैकी एकाला मित्रांनी वाचवले पण जुबेर सय्यद या वीस वर्षांच्या तरुणाला ते वाचवू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील मिलिटरी ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात 33 वर्षाचा सुतेश करावदे हा पोहण्यासाठी गेला होता. मात्र दुर्देवाने तो चिखलात अडकला आणि बाहेर पडू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. 

अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी तिघांचा बुडून ठाण्यात झाला आहे. येऊर सारख्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे तलावात जाणाऱ्या आणि धबधब्यात जाणाऱ्या लोकांवर बंदी घालावी अशी मागणी पुन्हा होत आहे. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget