एक्स्प्लोर

'...पण पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची होती'; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

Maharashtra: मुंबईतील रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलंय.

Mohan Bhagwat: जात देवानं नाही तर पंडितांनी निर्माण केली. देवानं नेहमीच सांगितलंय की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी वर्गवारी केली, जी चुकीची आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. तसेच, या वर्गवारीचा फायदा इतरांनी घेतला आणि त्यामुळेच देशावर हल्ला झाला, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. याच कारणास्तव बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्या देशावर राज्य केलं. मोहन भागवत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त (Sant Rohidas Maharaj Jayanti) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याच कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबईतील कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संत रोहिदास यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलं. देशाच्या आणि समाजाच्या विकासाचा मार्ग जर कोणी दाखवला असेल, तर तो संत रोहिदास यांनी. कारण त्यांनी समाजाला बळकट आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली परंपरा दिली आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

सरसंघचालक मोहन भागवत बोलताना म्हणाले की, "देशातील जनतेनं सुरुवातीला स्वत:च्या मनाला कोंडीत टाकलंय. याला कोणीही जबाबदार नाही, समाजातील आपुलकी संपली, तरच स्वार्थ मोठा होतो. आपल्या समाजाच्या फाळणीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे  पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. याचा फायदा बाहेरून आलेल्या लोकांनी घेतलाय."

पाहा व्हिडीओ : Mohan Bhagwat Full Speech : मानवता धर्म मानणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म : मोहन भागवत

देवानंही हेच सांगितलंय : सरसंघचालक मोहन भागवत

ते पुढे म्हणाले की, देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसतेय का? ही गोष्ट तुम्हाला कोणताही ब्राह्मण सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपली उपजीविका म्हणजे, समाजाप्रती जबाबदारी. प्रत्येक काम समाजासाठी असताना काही उच्च, काही शुद्र, किंवा काहीजण वेगळे कसे झाले? देव नेहमी म्हणतो की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यांच्यात जात, वर्ण नाही, पण पंडितांनी एक वर्गवारी केलीये, ते चुकीचं होतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, "देशात विवेक आणि चैतन्य हे सर्व एक आहेत. त्यांच्यात कोणताही फरक नाही. फक्त मत वेगळं आहे. आम्ही धर्म बदलण्याचा प्रयत्न केला नाही." बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "धर्म बदलला तर परिस्थिती कशी बदलायची हे सांगितलं आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget