एक्स्प्लोर

'...पण पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची होती'; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

Maharashtra: मुंबईतील रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलंय.

Mohan Bhagwat: जात देवानं नाही तर पंडितांनी निर्माण केली. देवानं नेहमीच सांगितलंय की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी वर्गवारी केली, जी चुकीची आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. तसेच, या वर्गवारीचा फायदा इतरांनी घेतला आणि त्यामुळेच देशावर हल्ला झाला, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. याच कारणास्तव बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्या देशावर राज्य केलं. मोहन भागवत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त (Sant Rohidas Maharaj Jayanti) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याच कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबईतील कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संत रोहिदास यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलं. देशाच्या आणि समाजाच्या विकासाचा मार्ग जर कोणी दाखवला असेल, तर तो संत रोहिदास यांनी. कारण त्यांनी समाजाला बळकट आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली परंपरा दिली आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

सरसंघचालक मोहन भागवत बोलताना म्हणाले की, "देशातील जनतेनं सुरुवातीला स्वत:च्या मनाला कोंडीत टाकलंय. याला कोणीही जबाबदार नाही, समाजातील आपुलकी संपली, तरच स्वार्थ मोठा होतो. आपल्या समाजाच्या फाळणीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे  पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. याचा फायदा बाहेरून आलेल्या लोकांनी घेतलाय."

पाहा व्हिडीओ : Mohan Bhagwat Full Speech : मानवता धर्म मानणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म : मोहन भागवत

देवानंही हेच सांगितलंय : सरसंघचालक मोहन भागवत

ते पुढे म्हणाले की, देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसतेय का? ही गोष्ट तुम्हाला कोणताही ब्राह्मण सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपली उपजीविका म्हणजे, समाजाप्रती जबाबदारी. प्रत्येक काम समाजासाठी असताना काही उच्च, काही शुद्र, किंवा काहीजण वेगळे कसे झाले? देव नेहमी म्हणतो की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यांच्यात जात, वर्ण नाही, पण पंडितांनी एक वर्गवारी केलीये, ते चुकीचं होतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, "देशात विवेक आणि चैतन्य हे सर्व एक आहेत. त्यांच्यात कोणताही फरक नाही. फक्त मत वेगळं आहे. आम्ही धर्म बदलण्याचा प्रयत्न केला नाही." बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "धर्म बदलला तर परिस्थिती कशी बदलायची हे सांगितलं आहे."

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget