एक्स्प्लोर

Raj Thackeray : आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूरच्यांना बाहेरचे म्हणता? मग उत्तर भारतीय स्थानिक का? राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray : मुंबईत उत्तर भारतीय महापौर करू असं बोलण्याची यांची हिंमत होते कारण तुम्ही कधी एक होऊच नये याचा बंदोबस्त त्यांनी केलाय, पैसे देऊन माणसे फोडलेत असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई : बाहेरून लोक आणले जातात आणि इथला मराठी टक्का कमी केला जातोय, मुंबईत मराठी माणसांना घरे नाकारली जातात, यांची ही हिंमत कसी होते असा प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या मुंबईतील भाषणामध्ये विचारला. हे उत्तर भारतीय लोक आमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोकांना बाहेरचे लोक म्हणतात, मग हे यूपी, बिहारी मुंबईचे स्थानिक का? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी ठाकरे बंधूंनी नाशिक, मुंबई आणि ठाणे या तीन ठिकाणी संयुक्त सभा घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्या तीनही भाषणातून मराठीच्या मुद्द्याला हात घातला. आपले मराठीपण पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत वाढणाऱ्या लोंढ्यांविषयी चिंता आणि संताप व्यक्त केला. उत्तर भारतातून हे लोक मुंबईत येतात आणि आमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोकांना बाहेरचे म्हणतात अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

Raj Thackeray Mumbai Speech : ... मग उत्तर भारतीय स्थानिक का?

राज ठाकरे म्हणाले की, "एका उत्तर भारतीय नेता म्हणाला की मुंबई महापालिकेमध्ये जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर त्या इथल्या स्थानिक उत्तर भारतीयांना द्या. बाहेरून येणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना देऊ नका. म्हणजे आमचे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोक आता बाहेरचे कधीपासून झाले? आणि हे यूपी, बिहारवाले आतले?"

कृपाशंकर सिंह हा भाजपचा नेता म्हणतोय की मुंबईत उत्तर भारतीय महापौर करू. यांची हिंमत कशी होते असं बोलायची? आपण बोलू शकतो का तिकडे जाऊन? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "हे लोक असे बोलतात याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे मराठी लोक एकत्र येऊच नये असा बंदोबस्त त्यांनी केलाय. त्यासाठी पैसे देऊन माणसं फोडली जातात. आपले लोक एकत्र येताच कामा नयेत, मराठी माणसं एकत्र येऊच नयेत असा यांचा प्रयत्न आहे. मग यांना पाहिजे ते साध्य करायचा डाव आहे."

बाहेरून लोक येतात आणि वाट्टेल ते बोलतात. मुंबईमध्ये मराठी माणसांना घरे नाकारली जातात? बाहेरुन माणसे आणायची आणि मराठी टक्का कमी करायचा हे प्रयत्न सुरू आहेत असं राज ठाकरे म्हणाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget