एक्स्प्लोर
शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं
शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.
![शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं palghar loksabha bypoll vishnu sawara meeting with CM Devendra fadnavis latest update शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/31131530/CM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजतं आहे. शिवसेनेच्या या खेळीने भाजप मात्र संभ्रमात पडलं आहे. त्यांच्या या राजकारणामुळे भाजपची बरीच गोची झाली आहे.
शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी उमेदवार निश्चितीवरून ‘वर्षा’वर बरीच खलबतं झाल्याचं समजतं आहे.
दरम्यान, भाजप आता नेमका काय निर्णय घेणार आणि कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम
चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला.
भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न
वनगा कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांशी सहमत नसल्याचं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले होते.
वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी : सूत्र
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
![शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/05075932/Vishnu_Sawra.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)