एक्स्प्लोर

...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत

Mumbai Corona Update : जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती

Mumbai Corona Update : सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं सहर असलेल्या मुंबईतही कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच मुंबईतील दैनंदिन रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचंही याच मुलाखतीत बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं. 

मुलाखतीत बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, "सध्या शहरात 30 हजार बेड उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही मुंबईतील लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे. सध्या कठोर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही. जर मुंबईत एका दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, तर कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये आधीप्रमाणे केवळ पॉझिटिव्हिटी दर नाहीतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि बेड्सच्या उपलब्धतेची संख्याही लक्षात घेतली जाईल. 

दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचा वाढता आकडा, यावर बोलताना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, त्यांनी दररोज 10 हजार बेड्स भरले तरी आपण परिस्थिती हाताळू शकतो. तसेच यासंदर्भात तज्ज्ञांशीही बोलणं झालं आहे. ते म्हणतात की, मुंबईत 80 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनची आहेत. येत्या काही दिवसांत ते प्रमाम 90 टक्क्यांवर पोहोचेल.

मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉनबाधित

मुंबईमधील  (Mumbai ) कोरोनाबाधितांच्या (Corona) स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच (Omicron) हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबात माहिती दिली आहे.

सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget