एक्स्प्लोर

Mumbai 1993 Bomb Blast : बॉम्बस्फोटावेळी शरद पवार खोटं का बोलले?

Mumbai 1993 Bomb Blast : साल 1993... महिना मार्च... तारीख 12... मुंबईकरांच्या अंगावर शहारे आणणारा दिवस.

Mumbai 1993 Bomb Blast : आज 12 मार्च... प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवणारा दिवस. या दिवसाच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी मुंबईकर कधीच विसरु शकणार नाहीत. एक नाही, दोन नाही, तर मुंबईत झालेल्या तब्बल 12 बॉम्बस्फोटांनी अवघ्या देशाला हादरवलं होतं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. आज या घटनेला 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. दहशतवादी टायगर मेमन (Tiger Memon) आणि त्याचा भाऊ याकुब मेमन (Yakub Memon) या दोघांनी हे स्फोट घडवून आणल्याचं समोर आलं होतं. यावेळीच आणखी एक गोष्ट घडली होती, ती फारशी कोणाला माहीत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे, संवेदनशील परिस्थितीत देशाला सावरण्यासाठी शरद पवारांनी उचललेलं पाऊल.  

साल 1993... महिना मार्च... तारीख 12... पण त्यासाठी थोडासा मागचा संदर्भ जाणून घेऊयात. 1992 मध्ये 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली. ही घटना घडली उत्तर प्रदेशमध्ये पण त्याचे पडसाद उमटले थेट मुंबईत. संपूर्ण मुंबईत दंगल उसळली होती. डिसेंबर 1992 ते अगदी फेब्रुवारी 1993 पर्यंत मुंबई धगगत होती. मार्च उजाडला आणि सर्व काही स्थिर होणार असं वाटतंच होतं. इतक्यात मुंबईत एका पाठोपाठ एक 12 बॉम्ब स्फोट घडले. 257 जणांनी यात आपला जीव गमावला. तर 1400 लोक जखमी झाले. मुंबई हादरली होती. दहशतवादी टायगर मेमन (Tiger Memon) आणि त्याचा भाऊ याकुब मेमन (Yakub Memon) या दोघांनी स्फोट घडवून आणले आणि ते ही एका व्यक्तीच्या सांगण्यावरून, त्याचं नाव म्हणजे, डॉन दाऊद इब्राहीम कासकर.  

मुंबईत नुकतीच दंगल झाली होती आणि त्यातून मुंबई सावरते इतक्यात 12 बॉम्बस्फोटांनी पुन्हा ती हादरली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. अशातच सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी कोणाला तरी देण्याबाबत दिल्लीत चर्चा सुरु झाल्या. इतक्यात नाव आलं शरद पवारांचं. शरद पवारांना दिल्लीतून मुंबईत पाठवण्यात आलं होतं. त्यांनी हे स्फोट होण्याच्या 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच, 6 मार्च 1993 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा ताबा घेतला होता. अशातच मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी तत्कालीन नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर होती. 

पाहा व्हिडीओ : Mumbai 1993 Bomb Blast : ...जेव्हा 1993 च्या बॉम्ब स्फोटाबाबत Sharad Pawar खोटं बोलले!

बॉम्ब स्फोट घडले आणि ते कुणी घडवले हा अंदाजा सर्वांनाच आला होता. ही हालचाल धार्मिक आणि बदल्याच्या भावनेतून झाली होती आणि या स्फोटांचं कुठेतरी पाकिस्तान कनेक्शन नक्कीच होतं, हे सर्वांसमोर होतं. Fisherman's Colony in Mahim causeway,  Zaveri Bazaar Fort, Plaza Cinema Dadar, Century Bazaar, Katha Bazaar, Hotel Sea Rock, Chhatrapati Shivaji International Airport ,  Air India Building, Hotel Juhu Centaur, Worli, Bombay Stock Exchange, Passport Office अशी या बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांची नाव होती आणि यात यादीत कुठेही मुस्लीमबहुल भाग नव्हता. त्यामुळे हे स्फोट हिंदूंना संपवण्यासाठी झाले का? असा सूर येण्याची शक्यता होती. पवारांनी नेमकं तेच ओळखलं. आधीच परिस्थिती गंभीर, त्यात महिन्याभरापूर्वीच मुंबई धार्मिकवादातून पेटलेली दंगल. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता होतीच. 

शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटाची सर्व माहिती घेतली आणि ते थेट दूरदर्शनच्या ऑफिसात पोहोचले. ते मुंबईसोबतच अवघा देश हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत ते जनतेशी संवाद साधणार होते. मुंबईत 12 ठिकाणी स्फोट झालेले असतानाही जनतेला माहिती देताना मात्र शरद पवारांनी 13 ठिकाणी स्फोट झाल्याचं सांगितलं. आणि बॉम्ब स्फोट झालेल्या ठिकाणांच्या यादीत आणखी एक नाव वाढवलं. त्या भागाचं नाव होत, मस्जिद बंदर. मुंबईतील एक मुस्लीमबहुल भाग. 

आता प्रश्न असा आहे की, शरद पवारांनी असं का केलं? तर मी आधी म्हटल्याप्रमाणे, काही महिन्यांपूर्वीच हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती आणि कुठेतरी ते प्रकरण ताजं होतं. त्यामुळे या बॉम्ब स्फोटांमध्ये कोणत्या ठराविक धर्माच्या लोकांना टार्गेट केलं नाहीये, असं त्यांना भासवून द्यायचं होतं. आणि प्रसंगावधान राखत त्यांनी हे पाऊल उचललं. नाहीतर कदाचित अजून एक दंगल मुंबईनं पहिली असती. ती दंगल रोखण्यासाठी म्हणून पवारांनी ही शक्कल लढवली आणि सर्व काही सांभाळून घेतलं. 

शरद पवारांनी हा किस्सा अनेक वर्षांनी त्यांची राजकीय आत्मकथा 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या पुस्तकातून सांगितला. एवढंच नाहीतर त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये देखील सांगितला आहे.

एकंदरीत काय... तर जबाबदार मुख्यमंत्री कसा असतो? हे शरद पवारांनी दाखवून दिलं. आणि जबाबदारी ही कागदोपत्री नसते तर विचारात असते इतकं मात्र नक्की.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai 1993 Bomb Blast : 12 मार्च अन् 12 स्फोट! मुंबईसह देशाला हादरवून टाकणारा तो काळा दिवस... नेमकं काय घडलेलं...

About the author संकेत वरक

संकेत वरक
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओही शेअर
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओही शेअर

व्हिडीओ

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget