एक्स्प्लोर

लाईट गेल्यानंतर कलावंतांनी मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं!

मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं.

मुंबई : ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीचा प्रत्यय आला. नाटक सुरु असताना नाट्यगृहाची वीज गेली. त्यावेळी प्रेक्षकांनी आपापल्या मोबाईलची लाईट सुरु केली आणि नाटक सुरु ठेवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे कलावंतांनीही मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं. मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं. नेमकं काय घडलं? मुंबईतील परळमधील दामोदर हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग होता. यावेळी दुसऱ्या अंकादरम्यान नाट्यगृहाची वीज गायब झाली. त्यानंतर नाटकाशी संबंधितांनी विजेबाबत नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यामुळे वीज परत कधी येणार, याबाबत अस्पष्टता होती. विशेष म्हणजे, यावेळी नाटक पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार व्यक्त न करता आपल्या प्रगल्भतेचं दर्शन घडवलं. प्रेक्षकांनी मोबाईलच्या लाईट सुरु केल्या आणि नाटक सुरु करण्याचं कलाकारांना आवाहन केलं. कलाकारांनीही मोबाईलच्या उजेडात नाटकाचा दुसरा अंक पार पाडला. यावेळी कलाकार आणि प्रेक्षकांनी ‘शो मस्ट गो ऑन’ ही उक्ती प्रत्यक्षात उतरवली. मराठी नाट्यरसिकांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाला दिलेली ही एकप्रकारे दादच म्हणायला हवी.
“मराठी प्रेक्षक असा दिलदार आहे. काल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या आमच्या नाटकाच्या दुसर्या अंकात वीज गेली. अर्धा तास काहीच उत्तर मिळत नव्हतं. शेवटी प्रेक्षक म्हणाले आम्ही मोबाईलचे लाईट चालू करतो. तुम्ही प्रयोग करा. आणि दुसरा अंक प्रेक्षकांनी त्यांच्या मोबाईलच्या प्रकाशात पाहिला. आमच्या कलावंतांनी एवढी अप्रतिम उर्जा दाखवत प्रयोग सादर केला की लाईट नाही याचा विसर पडला. या अविस्मरणीय क्षणांनी कालचा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा झाला. या रसिकांना कधीच विसरू शकत नाही.” - अरविंद जगताप, लेखक-दिग्दर्शक, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
19748709_10209767727690949_7406037154741562612_n आपल्या आजूबाजूच्या घडामोडींवर, विषयांवर प्रखरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे. विशेषत: महापुरुषांच्या दैवतीकरणाच्या मुद्द्यावर नाटकात विशेष भर देण्यात आला आहे. माणसांमधील ‘लिबर्टी’ हरवत जात असल्याची खंत शेवटी व्यक्त करण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काळजाला भिडणारे पत्र लिहिणाऱ्या अरविंद जगताप लिखित भिडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे संवाद, हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Powai IIT Student Death: आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली,
आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली, "माझ्या मुलाचा छळ करून त्याला मारलं..."
Disha Salian and Aaditya Thackeray: दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
Mumbai Powai IIT Student Death: यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
Mumbai Crime: मोठी बातमी! जयपूर ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा; व्यावसायिकाकडून उकळली 2.25 कोटींची खंडणी, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! जयपूर ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा; व्यावसायिकाकडून उकळली 2.25 कोटींची खंडणी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Shirsat: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
Mumbai Powai IIT Student Death: आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली,
आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली, "माझ्या मुलाचा छळ करून त्याला मारलं..."
Solapur Crime News: 'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Sanjay Raut: गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
Disha Salian and Aaditya Thackeray: दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
Embed widget