एक्स्प्लोर

लाईट गेल्यानंतर कलावंतांनी मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं!

मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं.

मुंबई : ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीचा प्रत्यय आला. नाटक सुरु असताना नाट्यगृहाची वीज गेली. त्यावेळी प्रेक्षकांनी आपापल्या मोबाईलची लाईट सुरु केली आणि नाटक सुरु ठेवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे कलावंतांनीही मोबाईलच्या उजेडात नाटक पूर्ण केलं. मराठी नाट्य कलावंतांच्या रंगभूमीबद्दल असणाऱ्या आदर आणि प्रेमाचं, तर प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं आणि संयमीपणाचं दर्शन यावेळी घडलं. नेमकं काय घडलं? मुंबईतील परळमधील दामोदर हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग होता. यावेळी दुसऱ्या अंकादरम्यान नाट्यगृहाची वीज गायब झाली. त्यानंतर नाटकाशी संबंधितांनी विजेबाबत नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यामुळे वीज परत कधी येणार, याबाबत अस्पष्टता होती. विशेष म्हणजे, यावेळी नाटक पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार व्यक्त न करता आपल्या प्रगल्भतेचं दर्शन घडवलं. प्रेक्षकांनी मोबाईलच्या लाईट सुरु केल्या आणि नाटक सुरु करण्याचं कलाकारांना आवाहन केलं. कलाकारांनीही मोबाईलच्या उजेडात नाटकाचा दुसरा अंक पार पाडला. यावेळी कलाकार आणि प्रेक्षकांनी ‘शो मस्ट गो ऑन’ ही उक्ती प्रत्यक्षात उतरवली. मराठी नाट्यरसिकांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाला दिलेली ही एकप्रकारे दादच म्हणायला हवी.
“मराठी प्रेक्षक असा दिलदार आहे. काल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या आमच्या नाटकाच्या दुसर्या अंकात वीज गेली. अर्धा तास काहीच उत्तर मिळत नव्हतं. शेवटी प्रेक्षक म्हणाले आम्ही मोबाईलचे लाईट चालू करतो. तुम्ही प्रयोग करा. आणि दुसरा अंक प्रेक्षकांनी त्यांच्या मोबाईलच्या प्रकाशात पाहिला. आमच्या कलावंतांनी एवढी अप्रतिम उर्जा दाखवत प्रयोग सादर केला की लाईट नाही याचा विसर पडला. या अविस्मरणीय क्षणांनी कालचा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा झाला. या रसिकांना कधीच विसरू शकत नाही.” - अरविंद जगताप, लेखक-दिग्दर्शक, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
19748709_10209767727690949_7406037154741562612_n आपल्या आजूबाजूच्या घडामोडींवर, विषयांवर प्रखरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे. विशेषत: महापुरुषांच्या दैवतीकरणाच्या मुद्द्यावर नाटकात विशेष भर देण्यात आला आहे. माणसांमधील ‘लिबर्टी’ हरवत जात असल्याची खंत शेवटी व्यक्त करण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काळजाला भिडणारे पत्र लिहिणाऱ्या अरविंद जगताप लिखित भिडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे संवाद, हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर मुख्यमंत्री नाराज, दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना मिळणार नोटीस
सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर मुख्यमंत्री नाराज, दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना मिळणार नोटीस
Devendra Fadnavis Majha Vision: राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान
राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान
फडणवीसांचं एकूण बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, आता एकनाथ शिंदेंचं एकूण.... अंबादास दानवेंचा टोला 
फडणवीसांचं एकूण बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, आता एकनाथ शिंदेंचं एकूण.... अंबादास दानवेंचा टोला 

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
Supriya Sule : पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय : सुप्रिया सुळे
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होत असल्याबद्दल सर्व पक्षांचं स्वागत, उद्धव ठाकरेंना टोला मारत म्हणाले...
लढायची वेळ येते तेव्हा... एकनाथ शिंदेंकडून विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरेंना टोला, नेमकं काय म्हणाले?
Embed widget