एक्स्प्लोर

Coronavirus Vaccination : आवाज कुणाचा??? दुसऱ्या डोसचा!

Coronavirus Vaccination : 45 वर्षांवरील, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स या वर्गाकरिता लस पुरविण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली असून ज्यापद्धतीने त्यांच्याकडून लसीचा पुरवठा होईल त्यापद्धतीने लसीकरण केले जात आहे. दरम्यान, लसीकरिता अनाठायी धावपळ करण्यापेक्षा त्याच तारखेला लस घेण्याचा अट्टाहास न ठेवता, एक दोन आठवडे मागे पुढे झाले तरी काही फारसा फरक पडत नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

मुंबई : रेमेडेसीवर आणि ऑक्सिजन टंचाईच्या चर्चेतून कुठे बाहेर पडत नाही, तोच आता नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे, ती लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची. गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हे  चित्र केवळ मुंबई पुरतेच मर्यादीत नसून राज्यातील सर्व भागात हीच परिस्थिती आहे. लसीकरण केंद्रावर लस आली तरी ती लवकर संपत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक ज्यांचा पहिला डोस मिळण्यात काही अडचण आली नाही मात्र त्यांना दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहे. 45 वर्षांवरील, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स या वर्गाकरिता लस पुरविण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली असून ज्यापद्धतीने त्यांच्याकडून लसीचा पुरवठा होईल त्यापद्धतीने लसीकरण केले जात आहे. दरम्यान, लसीकरिता अनाठायी धावपळ करण्यापेक्षा त्याच तारखेला लस घेण्याचा अट्टाहास न ठेवता, एक दोन आठवडे मागे पुढे झाले तरी काही फारसा फरक पडत नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

विशेष म्हणजे लसीकरणाच्या अनुषंगाने नागरिकांना देण्यात आलेल्या सूचना या दिवसागणिक बदलू शकतात. कारण जितका साठा येईल तोपर्यंत लसीकरण केंद्रावर लसी देणायचे काम सुरु असते. मात्र लस संपल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. नागरिकांनी राज्य शासनाची परिस्थितीत लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांचा हेतू जास्तीत जास्त लोकांना लस देणे हाच आहे.  

याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "लोकांनी विनाकारण धावपळ करू नये. कोविशील्डसाठी 6 आठवड्यापासून तीन महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. तर कोवॅक्सीनसाठी 6 आठवडे थांबू शकता. कोवॅक्सीनसाठी दुसरा डोस हवा असेल तर ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात, मात्र कोविशील्डसाठी अगोदर वेळ घेऊन मगच लसीकरण केंद्रांवर गेले पाहिजे. नागरिकांनी सर्व गोष्टीची माहिती घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची ही वेळ आहे. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून वेग वेगळे प्रयत्न महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना या लसीकरण मोहिमेत कोणताही त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहे, ड्राईव्ह व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात आले आहे." 

त्या पुढे असेही म्हणाल्या की,"18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पाच केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यांना वेळ घेऊनच लसीकरण केंद्रावर यावे असे अपेक्षित आहे. लसीचा साठा वाढला की आपसूकच केंद्र आणखी वाढविण्यात येतील. लोकांनी सगळ्या परिस्थितीचा विचार करावा, आणि  घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे. अनाठायी धावपळ करून नका. प्रत्येक सूचना लसीकरणाच्या अनुषंगाने प्रसार माध्यमातून देण्यात येत आहे."     

राज्यात 16 जानेवारीला लसीकरण करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतपर्यंत 1 कोटी 73 लाख 21 हजार 029 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या गटातील 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 15 हजार 274 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

राज्याच्या आरोग्य विभागातर्फे 6 मे रोजी जी माहिती देण्यात आली त्यामध्ये, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget