एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari : विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपालाचं सरकारला पत्र

विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई : पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडावा का? या विचारात ठाकरे सरकार असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्यपालांनी 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात महत्वाच्या तीन मुद्दयांवर लक्ष वेधले आहे. यामध्ये त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी प्रमुख मागणी देखील केली आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 5 आणि 6 जुलै रोजी होत असून, हा कालावधी वाढवावा अशी मागणी राज्यपालांनी केली आहे. तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटला आहे. तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष पद लवकरात लवकर भरावे. तर तिसरा मुद्दा ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्यामुळे या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊ नये, असे राज्यपाल म्हणाले. 

याआधी भाजप शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जून रोजी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या. राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातं. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणत्या डेल्टा नाही, ना कोणता व्हायरस. ज्या पद्धतीचे घोटाळे बाहेर येत आहेत, विद्यार्थी, महिला, आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, हे अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त कालावधीचं अधिवेशन घ्यायला लावावे अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. 

त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त ठेवता येत नाही. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसंच ठेवता येत नाही, असं संविधान सांगतं. मात्र तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवणं हे संविधानाच अवमुल्यन करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही, हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी देखील भाजप शिष्टमंडळाने केली होती.  तसेच ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले.  40 ते 50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवले नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं सरकारने सांगितले होतं. पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या निवडणूका पुढे ढकला अशी मागणी देखील त्यांनी केली होती. 

थोरात म्हणाले याच अधिवेशनात निवडणूक होईल 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याच पावसाळी अधिवेशनात आमचा अध्यक्ष होईल असे सांगितले.  तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पाच तारखेला सुरु होईल आणि सहा तारखेला संपेल असे देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Gunaratna Sadavarte: लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा 
गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढवणार, पुढच्या पाडव्यापर्यंत राजकारणात सक्रीय होणार, सदावर्तेंची मोठी घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Fire: ठाण्यातील 'हिरानंदानी इस्टेट'मधील इमारतीला आग, कारण अस्पष्ट
Festival of Lights : घाटकोपरच्या Park Side टेकडीवर दिवाळीचा झगमगाट, दिव्यांचा उत्सव
BMC Elections: 'मी मोदीजींचा भक्त', अभिनेते Mahesh Kothare यांना विश्वास, मुंबई पालिकेवर कमळ फुलेल
Kinnar Babu : किन्नर बाबू खानने तीन हजाराहून अधिक किन्नर मुंबईत आणल्याचा आरोप
Water Crisis : 'कामोठे परिसरात दिवाळीतही पाणी नाही', Malvika Aghadi चं CIDCO विरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Gunaratna Sadavarte: लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा 
गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढवणार, पुढच्या पाडव्यापर्यंत राजकारणात सक्रीय होणार, सदावर्तेंची मोठी घोषणा
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget