एक्स्प्लोर

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये राम कदम हे पहिलेच आहेत असं नाही. राम कदम यांच्यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी परिसीमा गाठली आहे.

मुंबई: सत्ताधारी भाजप नेत्यांचा वादग्रस्त विधानांची मालिका कायम आहे. सध्याचं ताजं उदाहरण म्हणजे घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांचं वक्तव्य. ‘मुलीचा विरोध असला तरी तिला पळवून आणून तुम्हाला देणार’ असं वक्तव्य आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलं. राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. मात्र वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये राम कदम हे पहिलेच आहेत असं नाही. राम कदम यांच्यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी परिसीमा गाठली आहे. भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वादग्रस्त वक्तव्याचे महामेरु म्हणावं लागेल. कारण रावसाहेब दानवे हे अनेकदा त्यांच्या वक्तव्याने वादात आले आहेत. राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात साले, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली होती. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता. याशिवाय दानवेंनी नोटाबंदीवेळीही वादग्रस्त वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं होतं. इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. शिवाय कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. आमदार प्रशांत परिचारक गेल्या वर्षी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केलं.सीमेवरचा जवान वर्षभर घरी येत नाही, तरीही त्याला मुलगा होतो आणि तो पेढे वाटतो, असं आमदार परिचारक म्हणाले होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख आधी गुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारु,  वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु, असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं होतं.  गिरीष बापट 'तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता, त्या आम्ही पण रात्रीच्या पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पुण्यात केले होते. नवरा बायकोच्या भांडणापेक्षा ठेवलेलीचा जास्त त्रास होऊ लागला आहे. पण ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोची भांडणे वाढणारच, अशी वादग्रस्त टिप्पणी मंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवड शहरात केली होती. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आरक्षणमुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागत असल्याचं वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. नाशिकमध्ये चित्पावन ब्राम्हण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.  याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं होतं. नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम अहमदनगरमध्ये उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी फेब्रुवारीत  2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचं काम करते' असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. 2016 मध्ये  रत्नागिरीच्या नाणिजच्या नरेंद्र महाराजांच्या 50 व्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते. संबंधित बातम्या  आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली  भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय?   आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात : मुक्ता टिळक   आधी गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु : सुभाष देशमुख   वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य   'होय, मी पण 'त्या' क्लिप रात्री बघतो', मंत्री गिरीष बापट यांची विद्यार्थ्यांसमोर कबुली   नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य 

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget