एक्स्प्लोर

संचारबंदीत पायी प्रवास करणाऱ्यांवरही गुन्हा; मग कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का?

नियम आणि कायदा सर्वांना सारखे असताना कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का? असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत. कारण, संचारबंदीत गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाने दिलेल्या पत्रावर वाधवान कुटुंबीयांनी राजरोसपणे प्रवास केल्याचे समोर आलं आहे.

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झालं अन् क्षणात अनेकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकजण शकडो किलोमीटर पायीच घरी निघाले. तर, काहींनी जीवघेणा प्रवास सुरू केला. यात दोघातिघांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक ठिकाणी अवैध प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली. असे असताना दुसरीकडे सरकारच्या आशिर्वादाने श्रीमंत धेंडांना संचारबंदीत फिरण्याची मुभा मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. लॉकडाऊनमध्येही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालाय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात संचारबंदी असताना सात गाड्यांमधून दिवाण हाऊसिंगशी संबंधित वाधवान कुटुंबातील 23 जण मुंबईतून महाबळेश्वरला पोहोचले, त्यांना गृहमंत्रालयातील सचिवांनी मदत केली, सोबत पत्र दिलं, त्या पत्राविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही माहितीच नसल्याचंही समोर येतंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट केलंय. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही.

लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ

वाधवान कुंटुंबीय माझा मित्रपरिवार गृह मंत्रालयाच्या विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी कुणाच्या सांगण्यावरुन हे पत्र दिलं, हे तपासानंतर समोर येईलचं. मात्र, वाधवान हे माझे कौटुंबिक मित्र असून कुटुंबातील काही कारणामुळे ते खंडाळ्यावरुन महाबेळश्वर प्रवास करणार आहे, अशी पत्राची सुरुवात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पत्रामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज झाल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीही कल्पना नाही. वाधवान कुटुंबातील काही सदस्य नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. असे असताना त्यांना परवानगी देण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, यावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र

वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का? देशात लॉकडाऊन झाल्यानंतर लाखो लोकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी शकडो किलोमीटर आपल्या कुटुंब कबिल्यासह पायी वाट घरली. सोबत चिल्लीपिल्ली घेत मजल दरमजल करत ही माणसं चालत होती. यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांचा प्रवास राज्यांच्या सीमांवरती संपला. सीमाबंदी असल्याने त्यांना राज्य ओलांडता आले नाही. तर, अनेकानी कंटेनरमधून, दुधाचे टँकरमध्ये, मालवाहू ट्रकला लटकून जीवघेणा प्रवास केला. असा प्रवास करताना ज्यांना पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संचारबंदीत कामानिमित्त बाहेर पडल्याने अनेकांना पोलिसांचा मार खावा लागला. दुसरीकडे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारे वाधवान कुटुंबीय संचारबंदीतही खुलेआम हिंडतंय. नियम आणि कायदा सर्वांनाच सारखा असतो मग वाधवान कुटुबीयांना वेगळा न्याय का? हजारो लोक चालत, बाईकवर, कंटेनरमध्ये लपून प्रवास करत असताना वाधवान कुटुंबीयांना राजरोस कशी परवानगी मिळते? कसलीही इमर्जन्सी नसताना महाबळेश्वरच्या सुटीसाठी ते लॉकडाऊन संपेपर्यंत थांबू शकत नाहीत का? अजूनही त्यांच्यावर महाबळेश्वर मध्ये गुन्हा दाखल का झाला नाही? असे प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget