एक्स्प्लोर

हुंड्यासाठी दोन सुनांची दीड लाखांना विक्री

सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या पुढाकारामुळे सदर प्रकरण उघडकीस आलं आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात सासरच्या 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार (पालघर) : विरारमध्ये एकाच घरातील दोन सुनांचा हुंड्यासाठी छळ करुन, सासू-सासऱ्यांनी दीड लाख रुपयांना त्यांची विक्री केल्याचा खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन्ही सुना एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींवर अत्याचारही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या पुढाकारामुळे सदर प्रकरण उघडकीस आलं आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात सासरच्या 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पश्चिमेच्या एम बी इस्टेटमधील सुमन कॉम्पलेक्समध्ये रावल कुटुंब राहतं. या कुटुंबातील संजय आणि वरुण या दोन भावांचे दोन सख्ख्या बहिणींशी 10 मार्च 2015 रोजी लग्न झालं होतं. संजय हा बिझनेसमन आहे, तर वरुण हा सीए आहे. लग्न झाल्यानंतर सहा महिने सगळं काही सुरळीत चालंल  होतं. मात्र  त्यानंतर रावल कुटुंबियांनी या दोन्ही बहिणीचा हुंड्यासाठी अतोनात छळ करण्यास सुरुवात केली. दुकान टाकण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून दोन्ही सुनांकडून पाच लाखांची मागणी करण्यात येत होती. परस्पर त्यांच्या वडिलांकडून 5 लाख घेतलेही. त्यानंतर पुन्हा 4 लाखांची मागणी केली. पण ती पूर्ण होऊ न शकल्याने त्या पीडित बहिणींचा शारीरिक, मानसिक छळ सुरु केला. 30 ऑगस्ट 2018 रोजी विरारमधील रावल कुटुंबीय या दोन्ही सुनांना घेऊन सर्व कुटुंबासह त्यांच्या मूळगावी राजस्थान येथे घेऊन गेले. 1 ते 9 सप्टेंबरपर्यंत त्यांना राजस्थानच्या सिरोहा जिल्ह्यातील पिनवाडा तालुक्यात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी कुटुंबातील काहींनी त्यांचा लैंगिक, मानसिक आणि शारीरिक छळ करून, पुन्हा त्यांना तुमच्या पतीकडे विरारला जा असे सांगून विराराला एका अनोळखी इसमासोबत पाठवलं. वसईला गाडी थांबल्यानंतर त्या उतरण्याचा प्रयत्न करीत असताना त्या अनोळखी माणसाने मात्र त्यांना उतरण्यास विरोध करून मिरारोड येथे घेऊन जात होता. त्याने त्याच्या बॅगही त्याच्या सोबत ठेवल्या होत्या. एवढेच नाही, तर तुमच्यासाठी मी तुमच्या सासऱ्याला दीड लाख रुपये दिले आहेत. ते मी कसे वसूल करतो, ते पहा अशी धमकीही दिली. रेल्वेत हा सर्व प्रकार सुरु असल्याने रेल्वेतील एका गुजराथी आणि साऊथ इंडियन कुटुंबाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी या दोन्ही पीडित मुलींना मदत करुन वसईत उतरवले आणि त्यामुळे त्याची सुटका झाली. त्यानंतर त्या नालासोपारा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावासोबत विराराला आल्या. तेव्हा मात्र त्या दोघींचे नवरे विरारला नव्हते. त्यानंतर सोसायटीत राहणाऱ्यांनी दोन्ही बहिणींना मानसिक बळ देऊन, तक्रारीसाठी विरार पोलिस ठाणे गाठलं. मात्र पोलिसांनी एका महिन्यापासून त्यांची तक्रारच घेतली नाही. शेवटी पोलीस अधीक्षकांकडे आपलं गाऱ्हाणं मांडल्यानंतर त्यांच्या आदेशाने विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सासरच्या पती, दीर, सासू, सासरे यांच्यासह 12 लोकांवर भा.द.वि.स. कलम ४९८अ, ३५४अ, ३५४ब, ३१३, ३२३, ५०४, ५०६, ३४, ३७० प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पती संजय रावल, दीर वरुण रावल, सासू लिलादेवी रावल, सासरे मोहनलाल रावल, मामे सासरे गजेंद्र रावल, काकी सासू आशा रावल यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून, अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरु असल्याचे पोलीस सांगत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.