एक्स्प्लोर

बजेट नसल्यानं जीआरपीला होमगार्डची साथ लांबणीवर; सुरक्षेसाठी पुरेसं संख्याबळ नाही, मुंबई लोकलची सुरक्षा ऐरणीवर?

भारतीय तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचा लोकलमध्ये घातपाताचा मोठा कट उध्वस्त केला आहे. त्यांनीच भारतातील मोठी रेल्वे स्थानकं, रेल्वे पूल त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

मुंबई : मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मुंबईतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र लोहमार्ग पोलिसांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं आणि अतिरिक्त होमगार्ड राज्य सरकारकडून मिळत नसल्यानं सुरक्षा कशी पुरवली जाईल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भारतीय तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये घातपात करण्याचा खूप मोठा कट उध्वस्त करण्यात आला आहे. जे दहशतवादी पकडण्यात आले आहेत, त्यांनीच भारतातील मोठी रेल्वे स्थानकं आणि रेल्वे पूल त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं आहे. मात्र वेळीच तपास यंत्रणांनी त्यांना पकडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पण रेल्वे सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले लोहमार्ग पोलीस पुरेसे आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी होमगार्डचे अतिरिक्त जवान पुरवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र बजेट नसल्यानं ही अतिरिक्त कुमक पुरावलीच गेली नाहीये, अशी माहिती लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.

लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या या मागणीकडे राज्य शासनानं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. कारण लोकलमधली प्रवासी संख्या आता हळूहळू का होईना पण वाढत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लोहमार्ग पोलिसांची कुमक या वाढणाऱ्या संख्येसाठी पुरेशी नाही, हे आकडेवारीतून देखील सिद्ध होत आहे.

मुंबईतील मध्य हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेवर सध्या रेल्वे प्रशासनाचं रेल्वे सुरक्षा बल आणि राज्य सरकारचं लोहमार्ग पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील असतात. रेल्वे सुरक्षा बलाची आकडेवारी पाहिली तर पश्चिम रेल्वेवर 1535 आणि मध्य रेल्वेवर 1957 आरपीएफ अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत.

दुसरीकडे दोन्ही रेल्वेमार्गांवर मिळून 3123 लोहमार्ग पोलीस सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला 150 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील आहेत. म्हणजेच, एकूण 6765 सुरक्षा कर्मी, मुंबई आणि आसपासच्या लोकल प्रवाशांसाठी सध्या कार्यरत आहेत. 

दरम्यान, ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल ही प्रवाशांची संख्या पाहता सुरक्षा यंत्रणांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे निश्चितच अतिरिक्त कुमक रेल्वे सुरक्षेसाठी देणं अत्यंत गरजेचे आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या निर्बंध असूनही 37 ते 38 लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत, त्यात रोज हजारो प्रवाशांची भर पडते आहे, अशात दहशतवादी कट उद्धवस्त झाल्यानं राज्य सरकार अतिरिक्त कुमक का देत नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget