एक्स्प्लोर

नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर

नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. शहरातील कोरोना संक्रमणात कमालीची घट झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात दीड हजारपर्यंत पोहचलेली दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या आता थेट दीडशेच्या आत आली आहे. महानगर पालिका प्रशासनाने केलेले ट्रेसिंग, एपीएमसीवर लावलेले निर्बंध आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणामामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. 

कोरोनाची दुसरी लाट पसरायला लागल्यानंतर नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती. मार्चनंतर एप्रिल महिन्यात तर कोरोना संक्रमण दिवसाला दीड हजारांच्या घरात जावून पोचले होते. रोजच्या वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवरही कमालीचा ताण आला होता. यानंतर महानगर आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोना संक्रमण पसरवणाऱ्यांना ट्रेसिंग करण्यास सुरवात केली. यासाठी विशेष टीमची निर्मिती करून रोज 10 हजार लोकांचे टेस्टींग करण्यास सुरवात केली. याचा फायदा कोरोना संक्रमण रोखण्यात झाला. 

दुसरीकडे एपीएमसी मार्केट मध्ये दिवसाला 25 ते 30 हजार लोकांची वर्दळ असल्याने तिथे कडक निर्बंध लावले. कोरोना टेस्ट केल्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश करण्यास माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर आदींना बंदी घालण्यात आली. हे होत असतानाच राज्य सरकारने लॉकडाऊन लावल्याने याचाही रूग्णसंख्या आवाक्यात येण्यात मदत झाली. या सर्वांचा परिणाम म्हणजे आज नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या गेल्या 10 दिवसांत कमी होवून ती फक्त 132 वर आली आहे. 

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी महानगर पालिका आरोग्य विभागाने कोरोना रुग्णालयाचे जाळे शहरात उभे केले आहे. शहरातील प्रत्येक विभागात कोरोना उपचार सेंटर उभा केल्याने नागरिकांना घराजवळ उपचार मिळू लागले. पन्नास वर्षावरील व्यक्तींना रूग्णालयात दाखल होणे अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठांचे मृत्यू कमी करण्यात यश आले. वॉर रूम तयार करीत कोरोना पेशंटला कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड, ॲाक्सिजन, व्हेंटीलेटर मिळेल याची त्वरीत माहिती दिली जात असल्याने घरातील इतर लोकांना कोरोना संक्रमीत होण्यापासून रोखण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Recruitment : राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, अध्यक्षपद 'या' अधिकाऱ्याकडे 
राज्यातील भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट,राज्य सरकारकडून गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget