एक्स्प्लोर

Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

Vande Mataram Debate : लोकसभेत 'वंदे मातरम' घोषणेवरुन जोरदार चर्चा सुरू असताना आता त्या नावाने स्वातंत्र्यलढ्यामध्ये सुरू झालेले वृत्तपत्रही चर्चेत आलं आहे.

Vande Mataram Newspaper History : लोकसभेमध्ये (Lok Sabha) वंदे मातरम (Vande Mataram) या घोषणेवर चांगलीच चर्चा रंगत असल्याचं चित्र आहे. 1875 साली बकिम चंद्र चटर्जी यांनी 1875 साली बंगाली आणि संस्कृत भाषेत वंदे मातरम हे गीत लिहिलं. त्याला आता 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. असंख्य स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighters) फाशीच्या क्षणीही 'वंदे मातरम'चा नारा देत होते. विविध तुरुंगांत वेगवेगळ्या ठिकाणी लढणाऱ्या क्रांतिकारकांचा एकच मंत्र होता आणि तो म्हणजे वंदे मातरम (Vande Mataram Chant).

बकिम चंद्र चटर्जी यांनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत वंदे मारतम गीताचा समावेश केला. त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी या गीताला चाल लावली. बंगालच्या फाळणीच्या वेळी, 1905 साली ज्यावेळी स्वातंत्रलढा त्याच्या सर्वोच्च शिखरावर होता त्यावेळी क्रांतिकारकांच्या मुखी वंदे मारतम हाच नारा होता. त्याचवेळी वंदे मातरम या नावाने एक वृत्तपत्रही सुरू करण्यात आलं होतं.

बिपिन चंद्र पाल यांचे वृत्तपत्र (Bipin Chandra Pal’s Newspaper)

राष्ट्रवादी नेते बिपिन चंद्र पाल यांनी 1906 साली कोलकात्याहून ‘वंदे मातरम’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. त्यावेळी एकीकडे बंगालच्या फाळणीविरोधात आंदोलन सुरू होतं, त्याचवेळी राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा पुकारला. वंदे मातरम हेदेखील त्यापैकीच एक. राष्ट्रवाद जागवणे, स्वदेशीला प्रोत्साहन देणे, भारतीयांची राजकीय आकांक्षा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश होता. बिपिन चंद्र पाल यांचे हे साप्ताहिक लवकरच एक प्रभावी बौद्धिक शस्त्र बनले.

वंदे मातरम वृत्तपत्रांचे योगदान (Role of Vande Mataram Newspapers)

वंदे मातरम हा नारा जितका जोशीला, तितकाच तो वृत्तपत्रामध्येही प्रभावी ठरला. त्या काळात ब्रिटिश सरकारविरोधी लढ्यामध्ये वृत्तपत्र हे मोठं शस्त्र होतं. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी लोकजागृतीसाठी, ब्रिटिश धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी वृत्तपत्रांची सुरुवात केली.

अरविंद घोष संपादक (Aurobindo Ghosh as Editor Vande Mataram)

बिपिन चंद्र पाल यांनी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू केल्यानंतर अरविंद घोष यांनी त्याचे संपादकपद स्वीकारले. त्यावेळी या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करण्यात आलं. अरविंद घोष यांनी वंदे मातरमला काँग्रेसच्या जहालमतवादी राष्ट्रवादी गटाचा प्रमुख आवाज बनवले.

ब्रिटिश सरकारने या वृत्तपत्राला अत्यंत धोकादायक मानले. एवढेच नव्हे, तर 1910 चा प्रेस अॅक्ट लागू करण्यामागे हे वृत्तपत्र एक महत्त्वाचे कारण असल्याचेही म्हटले गेले.

मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून वृत्तपत्र (Bhikaji Cama’s Vande Mataram Paris)

1909 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून ‘वंदे मातरम’ नावाचे राष्ट्रवादी वृत्तपत्र सुरू केले. भारतातील राष्ट्रवादाला बळ देणे, ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करणे यासाठी त्यांनी Paris Indian Society ची स्थापना केली आणि तिथूनच वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित केले. हे प्रकाशन ब्रिटिशांच्या बंदी आणि दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget