एक्स्प्लोर

Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

Vande Mataram Debate : लोकसभेत 'वंदे मातरम' घोषणेवरुन जोरदार चर्चा सुरू असताना आता त्या नावाने स्वातंत्र्यलढ्यामध्ये सुरू झालेले वृत्तपत्रही चर्चेत आलं आहे.

Vande Mataram Newspaper History : लोकसभेमध्ये (Lok Sabha) वंदे मातरम (Vande Mataram) या घोषणेवर चांगलीच चर्चा रंगत असल्याचं चित्र आहे. 1875 साली बकिम चंद्र चटर्जी यांनी 1875 साली बंगाली आणि संस्कृत भाषेत वंदे मातरम हे गीत लिहिलं. त्याला आता 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. असंख्य स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighters) फाशीच्या क्षणीही 'वंदे मातरम'चा नारा देत होते. विविध तुरुंगांत वेगवेगळ्या ठिकाणी लढणाऱ्या क्रांतिकारकांचा एकच मंत्र होता आणि तो म्हणजे वंदे मातरम (Vande Mataram Chant).

बकिम चंद्र चटर्जी यांनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत वंदे मारतम गीताचा समावेश केला. त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी या गीताला चाल लावली. बंगालच्या फाळणीच्या वेळी, 1905 साली ज्यावेळी स्वातंत्रलढा त्याच्या सर्वोच्च शिखरावर होता त्यावेळी क्रांतिकारकांच्या मुखी वंदे मारतम हाच नारा होता. त्याचवेळी वंदे मातरम या नावाने एक वृत्तपत्रही सुरू करण्यात आलं होतं.

बिपिन चंद्र पाल यांचे वृत्तपत्र (Bipin Chandra Pal’s Newspaper)

राष्ट्रवादी नेते बिपिन चंद्र पाल यांनी 1906 साली कोलकात्याहून ‘वंदे मातरम’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. त्यावेळी एकीकडे बंगालच्या फाळणीविरोधात आंदोलन सुरू होतं, त्याचवेळी राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा पुकारला. वंदे मातरम हेदेखील त्यापैकीच एक. राष्ट्रवाद जागवणे, स्वदेशीला प्रोत्साहन देणे, भारतीयांची राजकीय आकांक्षा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश होता. बिपिन चंद्र पाल यांचे हे साप्ताहिक लवकरच एक प्रभावी बौद्धिक शस्त्र बनले.

वंदे मातरम वृत्तपत्रांचे योगदान (Role of Vande Mataram Newspapers)

वंदे मातरम हा नारा जितका जोशीला, तितकाच तो वृत्तपत्रामध्येही प्रभावी ठरला. त्या काळात ब्रिटिश सरकारविरोधी लढ्यामध्ये वृत्तपत्र हे मोठं शस्त्र होतं. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी लोकजागृतीसाठी, ब्रिटिश धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी वृत्तपत्रांची सुरुवात केली.

अरविंद घोष संपादक (Aurobindo Ghosh as Editor Vande Mataram)

बिपिन चंद्र पाल यांनी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू केल्यानंतर अरविंद घोष यांनी त्याचे संपादकपद स्वीकारले. त्यावेळी या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करण्यात आलं. अरविंद घोष यांनी वंदे मातरमला काँग्रेसच्या जहालमतवादी राष्ट्रवादी गटाचा प्रमुख आवाज बनवले.

ब्रिटिश सरकारने या वृत्तपत्राला अत्यंत धोकादायक मानले. एवढेच नव्हे, तर 1910 चा प्रेस अॅक्ट लागू करण्यामागे हे वृत्तपत्र एक महत्त्वाचे कारण असल्याचेही म्हटले गेले.

मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून वृत्तपत्र (Bhikaji Cama’s Vande Mataram Paris)

1909 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून ‘वंदे मातरम’ नावाचे राष्ट्रवादी वृत्तपत्र सुरू केले. भारतातील राष्ट्रवादाला बळ देणे, ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करणे यासाठी त्यांनी Paris Indian Society ची स्थापना केली आणि तिथूनच वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित केले. हे प्रकाशन ब्रिटिशांच्या बंदी आणि दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Pune Crime News : पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Embed widget