एक्स्प्लोर

Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

Vande Mataram Debate : लोकसभेत 'वंदे मातरम' घोषणेवरुन जोरदार चर्चा सुरू असताना आता त्या नावाने स्वातंत्र्यलढ्यामध्ये सुरू झालेले वृत्तपत्रही चर्चेत आलं आहे.

Vande Mataram Newspaper History : लोकसभेमध्ये (Lok Sabha) वंदे मातरम (Vande Mataram) या घोषणेवर चांगलीच चर्चा रंगत असल्याचं चित्र आहे. 1875 साली बकिम चंद्र चटर्जी यांनी 1875 साली बंगाली आणि संस्कृत भाषेत वंदे मातरम हे गीत लिहिलं. त्याला आता 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. असंख्य स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighters) फाशीच्या क्षणीही 'वंदे मातरम'चा नारा देत होते. विविध तुरुंगांत वेगवेगळ्या ठिकाणी लढणाऱ्या क्रांतिकारकांचा एकच मंत्र होता आणि तो म्हणजे वंदे मातरम (Vande Mataram Chant).

बकिम चंद्र चटर्जी यांनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत वंदे मारतम गीताचा समावेश केला. त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी या गीताला चाल लावली. बंगालच्या फाळणीच्या वेळी, 1905 साली ज्यावेळी स्वातंत्रलढा त्याच्या सर्वोच्च शिखरावर होता त्यावेळी क्रांतिकारकांच्या मुखी वंदे मारतम हाच नारा होता. त्याचवेळी वंदे मातरम या नावाने एक वृत्तपत्रही सुरू करण्यात आलं होतं.

बिपिन चंद्र पाल यांचे वृत्तपत्र (Bipin Chandra Pal’s Newspaper)

राष्ट्रवादी नेते बिपिन चंद्र पाल यांनी 1906 साली कोलकात्याहून ‘वंदे मातरम’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. त्यावेळी एकीकडे बंगालच्या फाळणीविरोधात आंदोलन सुरू होतं, त्याचवेळी राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा पुकारला. वंदे मातरम हेदेखील त्यापैकीच एक. राष्ट्रवाद जागवणे, स्वदेशीला प्रोत्साहन देणे, भारतीयांची राजकीय आकांक्षा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश होता. बिपिन चंद्र पाल यांचे हे साप्ताहिक लवकरच एक प्रभावी बौद्धिक शस्त्र बनले.

वंदे मातरम वृत्तपत्रांचे योगदान (Role of Vande Mataram Newspapers)

वंदे मातरम हा नारा जितका जोशीला, तितकाच तो वृत्तपत्रामध्येही प्रभावी ठरला. त्या काळात ब्रिटिश सरकारविरोधी लढ्यामध्ये वृत्तपत्र हे मोठं शस्त्र होतं. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी लोकजागृतीसाठी, ब्रिटिश धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी वृत्तपत्रांची सुरुवात केली.

अरविंद घोष संपादक (Aurobindo Ghosh as Editor Vande Mataram)

बिपिन चंद्र पाल यांनी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू केल्यानंतर अरविंद घोष यांनी त्याचे संपादकपद स्वीकारले. त्यावेळी या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करण्यात आलं. अरविंद घोष यांनी वंदे मातरमला काँग्रेसच्या जहालमतवादी राष्ट्रवादी गटाचा प्रमुख आवाज बनवले.

ब्रिटिश सरकारने या वृत्तपत्राला अत्यंत धोकादायक मानले. एवढेच नव्हे, तर 1910 चा प्रेस अॅक्ट लागू करण्यामागे हे वृत्तपत्र एक महत्त्वाचे कारण असल्याचेही म्हटले गेले.

मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून वृत्तपत्र (Bhikaji Cama’s Vande Mataram Paris)

1909 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून ‘वंदे मातरम’ नावाचे राष्ट्रवादी वृत्तपत्र सुरू केले. भारतातील राष्ट्रवादाला बळ देणे, ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करणे यासाठी त्यांनी Paris Indian Society ची स्थापना केली आणि तिथूनच वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित केले. हे प्रकाशन ब्रिटिशांच्या बंदी आणि दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
Cockroach Janta Party : 'एकतर त्यांनी जंतर-मंतरवर यावं नाहीतर...', कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी ठेवली ही अट, म्हणाले 'सरकारने पहिल्याच दिवशी...'
'एकतर त्यांनी जंतर-मंतरवर यावं नाहीतर...', कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी ठेवली ही अट, म्हणाले 'सरकारने पहिल्याच दिवशी...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Embed widget