एक्स्प्लोर

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार

Priyanka Gandhi: चर्चेचा उद्देश फक्त जनतेचे लक्ष त्यांच्या ज्वलंत समस्यांवरून विचलित करण्यावर असल्याचा हल्लाबोल खासदार प्रियांका गांधी यांनी केला. प्रियांका गांधी यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.

वंदे मातरमवरील चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालची निवडणूक येत आहे. ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आणि देशासाठी कुर्बान्या दिल्या, त्यांच्यावर नवीन आरोप लादण्याची संधी सरकारला हवी आहे. या चर्चेचा उद्देश फक्त जनतेचे लक्ष त्यांच्या ज्वलंत समस्यांवरून विचलित करण्यावर असल्याचा हल्लाबोल खासदार प्रियांका गांधी यांनी केला. प्रियांका गांधी यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला. 

ज्वलंत मुद्द्यांवर सदनमध्ये चर्चा का होत नाही?

प्रियांका म्हणाल्या की, सरकार वर्तमान आणि भविष्याकडे पाहू इच्छित नाही, म्हणून ते पुन्हा त्याच भूतकाळात रेंगाळत राहू इच्छितात देशातील लोक आनंदी नाहीत, ते अनेक समस्यांनी त्रस्त आहेत आणि सरकार त्या समस्यांवर तोडगा काढत नाही. बेरोजगारी, महागाई, पेपर लीक होणे, आरक्षणासोबत खेळखंडोबा आणि महिलांच्या समस्यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सदनमध्ये चर्चा का होत नाही? पंतप्रधान भाषण चांगले देतात, पण तथ्यांच्या बाबतीत ते कमजोर पडतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले की, 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायले. मात्र, हे कोणत्या अधिवेशनात गायले हे त्यांनी सांगितले नाही. ते काँग्रेसचे अधिवेशन होते.

तर आज देश विकसित झाला नसता

प्रियांका म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना सतत लक्ष्य केले जाते, ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्षे तुरुंगात राहिले. नेहरूंनी जर इस्रो, डीआरडीओ, आयआयटी, आयआयएम (IIM), एम्स (AIIMS), बीएचईएल (BHEL), सेल (SAIL) सारख्या संस्थांची निर्मिती केली नसती, तर आज देश विकसित झाला नसता. नेहरूंच्या चुका आणि त्यांनी केलेले कथित अपमान याबद्दल पंतप्रधानांना जितक्या तक्रारी आहेत, त्या सर्वांची त्यांनी एक यादी  करावी. त्यानंतर वेळ निश्चित करून यावर एकदा चर्चा करावी आणि एकदाचे हे प्रकरण बंद करावे. त्यानंतर सदनचा महत्त्वाचा वेळ जनतेच्या खऱ्या समस्या (बेरोजगारी, महागाई, महिलांचे प्रश्न) सोडवण्यासाठी वापरावा.  

तेव्हा खबरी देण्याचे काम करत होते

अखिलेश यादव म्हणाले की, जे महापुरुष त्यांचे नाहीत, किंवा ज्या गोष्टी त्यांच्या नाहीत, त्या ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. वंदे मातरमने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वांना जोडले, परंतु आजचे दरारवादी लोक त्याच गोष्टीने देशाला तोडू इच्छितात. अशा लोकांनी पूर्वीही देशाशी दगाबाजी केली आणि आजही करत आहेत. ते म्हणाले की, वंदे मातरम हा दिखावा किंवा राजकारणाचा विषय नाही. जेव्हा सत्ता पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकतो, तेव्हा असे वाटते की वंदे मातरम त्यांनीच तयार केलेले गाणे आहे. ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भागच घेतला नाही, ते वंदे मातरमचे महत्त्व काय जाणणार. काही लोक वंदे मातरम मनापासून बोलत होते, तर काही लोक त्याच स्वातंत्र्यप्रेमींविरुद्ध इंग्रजांसाठी जासूसी आणि मुखबरीचे (खबरी देण्याचे) काम करत होते.

ते म्हणाले की, हे लोक राष्ट्रवादी नसून राष्ट्रात फूट पाडणारे आहेत. ज्याप्रमाणे इंग्रज फोडा आणि राज्य करा करत होते. तसेच आज काही लोक फूट पाडण्याचा मार्ग अवलंबत आहेत. या लोकांचा इतिहास तपासला पाहिजे की त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर वंदे मातरम का गायले नाही. खबरी देणाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, स्वातंत्र्यानंतरही त्यांनी स्वतःचे गीत का तयार केले? त्यांच्या एकांगी विचारांमुळे त्यांनी तिरंगा का फडकवला नाही? 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget