एक्स्प्लोर

मुंबईकरांना दिलासा; सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा वेग मंदावला आहे. घटणाऱ्या रुग्णसंख्या वाढीच्या वेगावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही रुग्णसंख्या वाढीच्या वेगातली ही कृत्रीम घट तर होणार नाही ना? अशी शक्यता व्यक्त केलीय.

मुंबई : मुंबईत गेल्या 24 तासांत वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा वेग आज सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्याचं दिसून येतंय. अर्थातच मुंबईकरांसाठी हे चित्र दिलासादायक आहे. मात्र या घटणाऱ्या रुग्णसंख्या वाढीच्या वेगावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही रुग्णसंख्यावाढीच्या वेगातली ही कृत्रीम घट तर ठरणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली. चाचणी करण्याचे निकष बदलल्याने रुग्णसंख्या वाढीत घट होईल पण ती कृत्रीम घट असेल असं त्यांनी म्हटलं.

मुंबई महापालिकेकडून चाचणीचे कोणते निकष बदलले गेले?

मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी पद्धतीत महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, लक्षणे नसलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी न करता त्यांना क्वॉरंटाईन करुन पाच दिवसांनंतर त्यांची चाचणी केली जाईल असं सांगितलं. यापूर्वी अशा गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी यापूर्वी विलगीकरणानंतर लगेचच करण्यात येत होती. मात्र या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून या गटातील व्यक्तींची विलगीकरणातील 5 दिवसानंतर वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

चाचणीत बदल करण्यामागे महापालिकेने सांगितलेली कारणे

हाय रिस्क कॉन्टॅक्ट लक्षणे नसलेल्यांच्या कोरोना चाचण्या फॉल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे विलगीकरणानंतर अशा व्यक्तींची किमान 5 दिवसांत चाचणी केली जाईल.

फॉल्स निगेटिव्ह केस म्हणजे काय?

फॉल्स निगेटिव्ह केस म्हणजे जे वस्तुतः बाधित आहेत, परंतु त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र 'निगेटिव्ह' येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत 'फॉल्स निगेटिव्ह टेस्ट' असे संबोधले जाते.

मात्र, बदललेल्या पद्धतीचा परिणाम काय होऊ शकतो?

हाय रिस्कमधील लक्षणे नसलेल्या व्यक्तींना (asymptomatic) क्वारंटाईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवले. जर एखाद्यामध्ये लक्षणे दिसली तर मग त्याची टेस्ट होणार आहे. यापूर्वी, हाय रिस्कमधील सरसकट सर्वांची कोविड- 19 ची चाचणी केली जात होती. यामध्ये बहुतांश जणांची टेस्ट पॉजिटिव्ह येत असे, परंतु त्यांना कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, पण लक्षणे दिसत नसल्याने त्यांची टेस्टच होणार नसल्याने रूग्णांची संख्या आपोआपच कमी होण्याची देखील शक्यता आहे. परंतु यामुळे हाय रिस्कमधील व्यक्तींचे व्यवस्थीत क्वारंटाईन न झाल्यास धोका निर्माण होवू शकतो.

सध्या राज्यात एकूण रूग्णांपैकी 80 टक्के रूग्णांमध्ये लक्षणे नाहीत (asymptomatic) तर 18 टक्के रूग्णांमध्ये लक्षणे आहेत ( Symptomatic) तर 2 टक्के रूग्ण क्रिटीकल आहेत. कोरोना पॉजिटिव्ह आहेत परंतु लक्षणे दिसत नसलेल्यांना वैद्यकीय उपचारांची गरज लागत नाही. त्यामुळे लक्षणे असलेल्यांच्या अधिकाधिक टेस्ट करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे लक्षणे असलेल्या आणि गंभीर आरोग्य स्थितीत असलेल्या कोरोना पॉजिटिव्ह रूग्णांना वैद्यकीय सुविधा प्राधान्याने मिळतील.

मुंबईतील गेल्या दहा दिवसांची कोरोनाबाधितांची आकडेवारी

6 एप्रिल - 57 रुग्ण 7 एप्रिल - 100 रुग्ण 8 एप्रिल - 106 रुग्ण 9 एप्रिल - 79 रुग्ण 10 एप्रिल - 218 रुग्ण 11 एप्रिल - 189 रुग्ण 12 एप्रिल - 217 रुग्ण 13 एप्रिल - 150 रुग्ण 14 एप्रिल - 204 रुग्ण 15 एप्रिल - 183 रुग्ण 16 एप्रिल - 107 रुग्ण

आतापर्यंत झालेल्या टेस्ट?

मुंबईत 13 एप्रिल 2020 पर्यंत मुंबईत तब्बल 27 हजार 397 चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच तारखेपर्यंत देशात एकूण 2 लाख 17 हजार 554 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ देशातील एकूण चाचण्यांच्या 12.59 टक्के एवढ्या वैद्यकीय चाचण्या या केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

 
Corona Test | कोरोना टेस्टनंतर मजुरांना गावी जाता येईल का? हायकोर्टाचा सरकारला सवाल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Gang War: 'आंदेकर टोळी अजूनही सक्रिय', गणेश काळेच्या हत्येने पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान!
Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ
Buldhana News : अंगणवाडीच्या जवळ चक्क स्मशानभूमी, प्रशासनाचा भोंगळ कारभार
Climate Crisis: हवामान बदलाचा थेट परिणाम, Iceland मध्ये पहिल्यांदाच आढळले मच्छर! Special Report
Raj Thackeray : 'दुबार मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा', कार्यकर्त्यांना थेट आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget