एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation | भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही : सूत्र

8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असं कळतं. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल.

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकर सुटेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. कारण भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून चर्चेची दारं बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉचच्या' भूमिकेत असल्याचं समजतं. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्वपक्षीयांची पावलं पडत असल्याचं चित्र आहे. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असं कळतं. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. केंद्रात भाजपचं सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निश्चिंत असल्याची चर्चा आहे. भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही असंही समजतं. भाजपकडून फोडाफोडीचं किंवा बेरजेचं राजकारण नाही 2014 साली भाजपच्या बाजूने आकडे होते. मात्र यंदा आमदारांचे आकडे कमी पडत असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे फोडाफोडीचं किंवा बेरजेचं राजकारण करुन सत्तास्थापनेचा कुठलाही प्रयत्न भाजपकडून होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. पुढील 48 तास निर्णायक असणार आहेत. शिवसेना आणि भाजपसाठी माईंडगेमचे असतील. त्यांच्या आणि जनतेच्या संयमाची परीक्षा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, काय टीका करतात आणि कोणती पावलं उचलतात, यावर सत्ता स्थापनेचा निर्णय ठरेल. तर भाजप, शिवसेनेसह सगळ्याच पक्षांवर टीका राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर भाजपसोबत इतर पक्षांवरही टीका होईल. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने हे त्रांगडं निर्माण झालं, अशी रणनीती भाजपकडून आखली जाऊ शकते. तर दुसरीकडे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण येत्या काही दिवसात राम मंदिराचा निकाल लागणार आहे. त्यावेळी कोणता पक्ष काय भूमिका घेतो, हे ठरणार आहे. तसंच झारखंड निवडणूकही प्रमुख मुद्दा आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली तर कुठल्या तोंडाने निवडणुकीला सामोरं जायचं, असा प्रश्न पक्षासमोर आहे. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र राष्ट्रपती राजवट आली तर आपले आमदार सांभाळणे कठीण होईल याची जाणीव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आहे. त्यामुळे तसं होत असेल हे एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना+राष्ट्रवादी सरकार, काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद आणि बाहेरुन पाठिंबा अशी चर्चा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सुरु झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
Shiv Sena Symbol Hearing: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
Embed widget