एक्स्प्लोर

मुंबईकरांचा कचरा आमच्या माथी का मारता? अंबरनाथमधील 25 गावांचा विरोध

अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, नारण, वाडे, नितलज ग्रामपंचायतींना एमएमआरडीएकडून जमीन हस्तांतरणासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या जागेवरील सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा टाण्यास नवीन जागा शोधली आहे. मुंबईबाहेर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी ही जागा असून, 300 एकर जागेवर हे डंम्पिंग ग्राऊंड उभ्यारण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथमधील 25 गावातील गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी गावकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असून, तीव्र आंदोलनाचाही इशारा दिलाय. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेण्यात येणार आहे. मंबईमध्ये दिवसाला प्रचंड प्रमाणात साठणाऱ्या घणकचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न सध्या मुंबई महापालिकेसमोर उभा राहिला आहे. शहरातील अनेक डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याने ओव्हरफ्लो झाल्याने भविष्यातील कचऱ्याचे काय करायचे याने पालिकेला सतावले आहे. यासाठी पालिकेने सरकारला साकडे घालत मुंबईच्या बाहेर असलेल्या अंबरनाथ तालूक्यात डम्पिंग ग्राऊंड उभारले जाणार आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या विस्तीर्ण जागेत 300 एकर जागेवर हे डम्पिंग तयार होणार आहे. यासाठी सध्या एमएमआरडीएकडून शेतकरी आणि येथील स्थानिक ग्रामपंचायतींना नोटिसा देण्याचे काम सुरु आहे. सरकराच्या या निर्णयाला अंबरनाथमधील 25 गावातील गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मुंबई शहराचा घनकचरा आमच्या माथी का मारता, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या कचऱ्यामुळे येथील निसर्गसंपन्न वातावरण खराब होणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील शेतकरी कसत असलेली शेती नष्ट होणार आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे येथील ओढा- नदीचे पात्र दूषित होणार असल्याने मासेमारी नष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहावरच घाला येणार आहे. अंबरनाथ तालुक्यात येणाऱ्या उसाटणे, नारण, वाडे, नितलज ग्रामपंचायतींना एमएमआरडीएकडून जमीन हस्तांतरणासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या जागेवरील सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून राज्य सरकार जमिनी घेऊन डम्पिंग ग्राऊंड उभा करणार असल्याने, आता याविरोधात येथील 25 गावातील शेतकरी एकवटले आहे. त्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असून याला तीव्र विरोध करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्रा घेतला आहे. कोकण आयुक्तांकडे गेल्या महिन्यात याबाबत बैठक पार पडली असून यात बैठकीतही डम्पिंग ग्राऊंडला विरोध कायम असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget