एक्स्प्लोर

Mumbai Heavy Rainfall : मुंबई आणि महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतोय, अजून किती दिवस कोसळणार?, हवामानतज्ज्ञ म्हणतात.....

Mumbai Heavy Rainfall : मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवारपासून पावसाचा जोर कमी होईल ,असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Mumbai Heavy Rainfall मुंबई : सध्या मुंबईसह राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या दमदार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील प्प झाली आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात अचानक इतका पाऊस का पडतोय? शिवाय अजून किती दिवस या पावसाच्या सरी राज्यात कोसळणार? याबाबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी महत्वपूर्ण माहिती दिलीय, ती जाणून घेऊ. 

दरम्यान, मुंबई सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय. तर उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात निर्माण झालेली एकंदरीत पावसाची परिस्थिती बाबत हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांना विचारले असता ते म्हणाले कि, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळ राज्यात आज मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. मात्र उद्यापासून (20 ऑगस्ट 2025) पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवार पासून पावसाचा जोर कमी होईल ,असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. मुंबई, कोकणला रेड अलर्ट असून पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबईत अचानक एवढा एवढा पाऊस का पडतोय?

मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतो आहे. सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी द्रोनीय रेषा तयार झाली आहे, जी उत्तर कोकण ते केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यांवर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळतांना दिसत आहेत.

मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद 

मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद  झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे.ही माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी उपनगरात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. मुंबईची मिठी नदी कोपली की, मुंबईत हाहा:कार माजतो. याचा प्रत्यय मुंबईकरांनी आणि लगतच्या उपनगरांनी 26 जुलैच्या पावसात घेतला आहे. सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे.

सध्या मिठी नदी 4.7 मीटरवरुन वाहत आहे. पण, मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तसेच, इतर भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कुर्ला, वांद्र्याच्या किनारी भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

मुंबईत सकाळी 10 वाजता काळाकुट्ट अंधार, समोरचंही दिसेना, लोकल 30 ते 40 मिनिटे उशिराने, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget