एक्स्प्लोर

Raju Shetti : वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार ; राजू शेट्टी यांचा इशारा 

Raju Shetti : वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.  

Raju Shetti : साखर घोटाळ्यापेक्षा वीज वितरण कंपनीचा घोटाळा मोठा आहे. कोणत्या नेत्याचे कोणते कोणते प्रकल्प आहेत? हे लवकरच बाहेर काढणार असून वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. याबरोबरच वीज वितरण कंपनीला इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, सरकार  फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही. या पूर्वी सरकारने फसवले आहे. त्यामुळे जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 
 
शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर साप वन्यजीव नाही म्हणून शेतकऱ्याला मदत मिळत नाही.  परंतु, शेतकऱ्याने सापाला मारले तर वन्यजीव मारला म्हणून शेतकऱ्यावर कावराई होते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले. 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी यावेळी साखर कारखानदारांनाही इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे, तोपर्यंत कारखानदारांना कारखाना बंद करता येणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

राजू शेट्टी म्हणाले, "सहकार मंत्र्यांना काही स्टेटमेंट द्यायचे म्हटले तर त्यांना आधी बारामतीची परवानगी घ्यावी लागते. किसनवीर सहकारी साखर कारखाना बंद होण्या मागचे कारण नुसते त्यांना कर्ज फिरवून दिले नाही असे नाही तर त्यातील भ्रष्टाचार आणि नोकर भरतीसारखी अनेक कारणे आहेत. देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की भाजपमध्ये आल्यामुळे किसनवीर सहकारी साखर कारखाना बंद पडला. परंतु, तो बंद पडू नये म्हणून तुमच्या ताब्यात मुंबईची जिल्हा बँक होती, त्यावेळी तुम्ही का सहकार्य केले नाही? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 17 June 2024Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Embed widget