एक्स्प्लोर

Maharashtra Agri Budget 2022 : राजू शेट्टी म्हणतात, शेतीपूरक व्यवसायाला चालना द्या, सदाभाऊ म्हणतात, केंद्राशी समन्वय साधा

आज दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प आहे. दुपारी 2 वाजता अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. तसेच सध्या राज्यातील शेतकरी देखील विविध संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय विशेष घोषणा होणार का? हे पाहावं लागेल. या अर्थसंकल्पातून शेतकरी नेत्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पाहुयात शेतकरी नेत्यांनी नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवल्या आहेत...

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने काही घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडले आहेत. हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...

शेतीपूरक उद्योगाला चालना द्या : राजू शेट्टी

आज विधानसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध अपेक्षा करण्यात येत आहेत. याबाबत राजू शेट्टींनी काही मुद्दे मांडले आहेत. शेतकऱ्यांसाठी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकार कधी देणार, शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांचे कर्ज भरल्यावर, त्यापुढील उर्वरीत कर्जाची रक्कम सरकार माफ करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. ती रक्कम माफ कधी करणार? असा सवाल यावेळी राजू शेट्टींनी उपस्थित केल. शेतीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी काय तरतूद करणार का? प्रकिया उद्योगासाठी काही तरतूद करणार का?  याकडे आमचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे राजू शेट्टी म्हणालेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. हे सरकार मुळात संवेदनशील नाही. जनतेच्या कोणत्याच जिव्हाळ्याच्या प्रश्नावर हे सरकर निर्णय घेत नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


Maharashtra Agri Budget 2022 : राजू शेट्टी म्हणतात, शेतीपूरक व्यवसायाला चालना द्या, सदाभाऊ म्हणतात, केंद्राशी समन्वय साधा

बाजार समितीच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करायला पाहिजे : सदाभाऊ खोत

कोरोनाच्या संकटामुळे आधीच राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. या संकटात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केवळ घोषणांचा पाऊस न पाडता शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना आणाव्यात असे खोत यावेळी म्हणाले. यासाठी सरकाराने शेतकरी कंपन्यांना ताकद द्यायला हवी. तसेच बाजार समितीच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. मार्केट व्यवस्था उभारायला पाहिजे असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले. आयात निर्यात धोरणात बदल करायला हवा. राज्य सरकारने केंद्राबरोबर समन्वय साधून शेतमाल वाहतुकीची व्यवस्था करायला पाहिजे. शेतीमध्ये जे नवं तंत्रज्ञान आहे, अवजारे आहेत, त्यासाठी काय तरी ठोस धोरण ठरवलं पाहिजे, असे खोत यावेळी म्हणाले. पाणी अडवण्याच्या योजना आणाव्यात. तसेच कृषीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरवावे असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

दरम्यान, अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषी संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget