एक्स्प्लोर

जिल्हाबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात बदल्यांचा घाट कशासाठी? सुरेश धस यांचा सवाल

भाजप-शिवसेना सरकारमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होत्या. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या संघटनांनी आघाडीच्या सरकारला निवेदने देऊन बदल्यांबाबत भूमिका घेण्याची विनंती केली होती.

बीड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असतानाच राज्य सरकारने 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. आजही अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. त्या काळामध्ये बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांनी करायचे कसे? असा प्रश्न भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या संकट काळात 4 मे रोजी राज्य सरकारकडून हे जाहीर करण्यात आलं होतं की 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षामध्ये राज्यभरात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या या धोरणाच्या पार्श्वभूमीवर होणार नाहीत. विशेष म्हणजे अनेक खर्चाला कात्री लावण्याचे निर्णय या काळात सरकारने केले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरती निर्बंध आणले होते. त्यानंतर मुंबईमधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण चांगलेच गाजले. याच बदल्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील नेत्यांमध्ये चर्चाही रंगल्या होत्या.

या बदली प्रकरणानंतर सरकारकडून 7 जुलैला पुन्हा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आला. ज्यात राज्यभरातील प्रत्येक संवर्गातील 15 टक्के अधिकारी आणि 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे या बदल्या करण्याचे अधिकार हे सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. विशेष म्हणजे या बदल्या निश्चित करण्याची मुदतही 31 जुलै 2020 ही जाहीर सुद्धा करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा एक नवीन आदेश काढण्यात आला, ज्यानुसार बदल्या करण्याची मुदत ही 31 जुलैवरून वाढवून ती आता 10 ऑगस्ट करण्यात आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या 31 जुलै ऐवजी 10 ऑगस्टपर्यंत करण्याच्या निर्णयाबद्दल अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाईन होणाऱ्या बदल्यांवर होतेय टीका.

भाजप-शिवसेना सरकारमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होत्या. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या संघटनांनी आघाडीच्या सरकारला निवेदने देऊन बदल्यांबाबत भूमिका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने सुरुवातीला प्राथमिक शिक्षक वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते.

मात्र त्यानंतर विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन करण्याचा निर्णय जाहीर केला. आता जर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या ऑफलाईन पद्धतीने होणार असतील तर मग तालुका आणि जिल्हास्तरावरच्या कार्यालयांमध्ये गर्दी होणार नाही हे कशावरून? कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या वर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करणे शक्‍य दिसत नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरू केली असून त्या अनुषंगाने शिक्षकांची ऑनलाईन अर्ज देखील केलेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या प्रचलित धोरणानुसार ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे..

पण जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्या करायचे ठरले तरी अनेक कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार आहे..जिल्हा भरा मधील प्राथमिक शिक्षकांची संख्या बघता हे सध्याच्या वातावरणामध्ये परवडणारे नाही.. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुद्धा दुरापास्त झालाय कोरोना चे रुग्ण रोज वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये अशा कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकानि नेने हे परवडणारे नाही असा आरोप सुरेश धस यांनी केलाय..

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Mumbai-Pune Expressway Missing Link :  मिसिंग लिंकवर कोणत्या वाहनांना प्रवेश, कोणाला बंदी? टोल आणि स्पीडची मर्यादा काय?
Mumbai-Pune Expressway Missing Link :  मिसिंग लिंकवर कोणत्या वाहनांना प्रवेश, कोणाला बंदी? टोल आणि स्पीडची मर्यादा काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
Embed widget