एक्स्प्लोर

भरतीत 'एसईबीसी'साठी पर्यायच नाही, मराठा विद्यार्थ्यांना फायदा कधी?

मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही.

बीड : मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या 342 जागांसाठीच्या भरतीत एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 342 जागांसाठीच्या भरतीच्या जाहिरातीतील विविध पदांसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जी माहिती अपलोड करायची आहे, ती माहिती भरली जात नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही. 16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा नोकरी भरतीच्या जाहिरातीनंतर अनेक विद्यार्थी आता फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र त्यांच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये जात प्रवर्गामध्ये बदलच करता येत नसल्याने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या नोकरभरतीत पुन्हा निराशाच हाती येते की काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे जातीचा प्रवर्ग कसा बदलायचा याचीदेखील माहिती कुठेच उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असतानाही या जाहिरातीवर नजर टाकल्यावर आठ टक्के इतकाच फायदा मराठा समाजातील मुलांना होणार आहे असे दिसते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र आयोगाकडून उत्तर नाही या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी इतर समाजातील मुलांसाठी त्यांच्या वेगळ्या प्रवर्गाची सोय या साईटवर करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजातील मुलांना अद्यापही या साईटवर आपला प्रवर्ग बदलता येत नाही. याची माहिती घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांना ई-मेलही केले आहेत. मात्र आयोगाकडून कुठलंही उत्तर मिळत नसल्याचं समोर आलं आहे. मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मुलांना मराठा जातीचे प्रमाणपत्र शासनाकडून मिळू लागले आहे. विशेष म्हणजे एमपीएससीचा फॉर्म भरताना 2014 साठी ज्या मुलांना मराठा समाजाचा जातीचे प्रमाणपत्र मिळाले होते, तेसुद्धा चालणार आहे. मात्र भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन आता पाच दिवसाचा कालावधी उलटला तरी फॉर्म कसा भरायचा? याची माहितीच उपलब्ध नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी चिंतेत आहेत. एमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा पद                                       एकूण जागा                  एसईबीसी उपजिल्हाधिकारी                               40                         04 पोलीस उप अधीक्षक                        34                         03 सहायक पोलीस आयुक्त सहायक संचालक                              16                         01 (वित्त व लेखा सेवा) तहसीलदार                                       77                         06 उप शिक्षणाधिकारी                           25                         02 (राज्य शिक्षण सेवा) कक्ष अधिकारी                                  16                         01 सहायक गट विकास अधिकारी         11                         01 नायब तहसीलदार                            113                       08

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget