एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या नेमक्या काय? सरकारकडून किती प्रतिसाद मिळाला? वाचा सविस्तर 

Manoj Jarange Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा एक महिन्यांचा वेळ घेतला आहे. 13 जुलैपर्यंत सरकारला हा वेळ देण्यात आला आहे.  

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येतंय. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं, तसेच मराठा आंदोलनाच्या काळात नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत यासह अनेक मागण्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केल्यात. त्यावर आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा एक महिन्याचा वेळ मागण्यात आला आहे. 

ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी जानेवारी महिन्यात मुंबईत आरक्षण करण्याचा निर्धारही त्यांनी केला होता. पण वाशीपर्यंत आलेल्या जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाठलं आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर लागोलाग राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठ्यांना 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचं जाहीर केलं. मात्र ही मराठा समाजाची फसवणूक असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं. 

मनोज जरांगेंच्या मागण्या नेमक्या काय? (Manoj Jarange Demands On Maratha Reservation) 

  • मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या.
  • ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे त्याच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्रक द्या.
  • ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्रक द्या
  • कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी 100 टक्के शिक्षण मोफत करा.
  • मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
  • मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.

कुणबी नोंदी ग्रामपंचायतमध्ये लावा

मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली. त्यांनी दावा केल्याप्रमाणे जर 57 लाख नोंदी सापडल्या असतील तर त्याच्या प्रमाणपत्राचं वाटप करावं. ज्यांच्या नोंदी सापडल्य आहेत त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीमध्ये लावाव्यात. त्यामुळे लोकांना माहिती मिळून त्यांना अर्ज करता येईल. 

राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत

अंतरवाली सराटीतील आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. त्या काळात मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गुन्हे मागे घेतले जातील असं जाहीर केलं होतं. पण त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आताही राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर मनोज जरांगे यांनी ही मागणी पुन्हा केली. 

मनोज जरांगेंच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतरही या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलंय. 

ही बातमी वाचा: 

 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Railway Protest: मुंबईत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
Embed widget