एक्स्प्लोर

Weather Update : कुठे थंडीचा कडाका, तर कुठे पावसाचा तडाखा; वाचा कोणत्या भागात काय स्थिती?   

Weather Update News : सध्या उत्तर भारतात (North India) कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील गारठा चांगला वाढला आहे.

Weather Update News : देशात वातावरणात सातत्यानं बदल (Climate change)  होत आहे. कुठे थंडीचा (Cold Weather)  कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. तर काही भागात पावसानं देखील हजेरी लावली आहे. दरम्यान, सध्या उत्तर भारतात (North India) कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील गारठा चांगला वाढला आहे. तापमानाचा  (Temperature)पारा 15 ते 20 अंशाच्य आसपास असल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, पुढच्या 24 तासात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज स्कायमेटने (Skymet) वर्तवला आहे. 

'या' भागात पावसाची हजेरी

सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असला तरी काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. देशातील तामिळनाडू राज्यातील काही भागासह  दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. तर कर्नाटक, केरळ आणि नागालँडमध्ये हलका पाऊस झाला आहे. ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळं तिथेही पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

पुढच्या 24 तासात या भागात दाट धुके पडण्याचा अंदाज

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आणखी हुडहुडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना काश्मीरमधील श्रीनगरमध्ये किमान तापमान -4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दरम्यान, खोऱ्यातील इतर भागात तापमान -8 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. काश्मीरमधील अनेक भागात पाण्याचे स्रोत गोठले असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातही पारा घसरला 

राज्यातील वातावरणात देखील सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात तापमानाचा पारा हा 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे. सर्वात कमी तापमान हे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) जाणवत आहे. मराठवाडा आणि विदर्भातही थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईतही (Mumbai) हुडहुडी वाढली आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमानात वेगानं घट होत आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्येही थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान, ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget