एक्स्प्लोर

Vat Purnima : साडेपाच एकरात पसरलेलं साताऱ्याच्या म्हसवे गावातील विस्तीर्ण वडाचं झाडं

आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेऊया वडाचं असं झाड ज्याच्याबद्दल वाचल्यावर किंवा ते पाहिल्यावर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. साताऱ्याच्या म्हसवे गावातील वडाचं हे विस्तीर्ण झाड तब्बल साडेपाच एकरात पसरलं आहे.

सातारा : दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी भरलेलं आहे. एक वडाचं झाड, ते झाड मोठं झाल्यावर त्याची पारंबी, मग त्या पारंबीचं झाड. नंतर त्या झाडाला नव्याने पारंबी. नंतर त्या पारंबीचे झाड, नंतर पुन्हा त्या झाडाला पारंबी....एका वडाच्या झाडाचा प्रवास असा काही सुरु झाला की हे झाड एक दोन नव्हे तर तब्बल साडे पाच एकरात पसरलं. असं म्हटलं जातं की 1880 सालापूर्वी एक वडाचं झाड होत आणि कालांतराने या एका वडाच्या झाडाचा पसारा असा फुलत गेला. हे सर्व एकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटणार यात शंका नाही.

हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हसवे गावातलं. पाचवडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. टुमदार असलेल्या या गावाला तिन्ही बाजूने हिरवागार डोंगराने व्यापलंय आणि यातील एका डोंगराचा भाग म्हणजे वैराटगड. याच्याच पायथ्याला हे म्हसवे गाव वसलेलं.. गावाचं मूळ नाव तसं म्हसवे मात्र या व्यापक वडाच्या झाडामुळे या गावाला म्हसवे वडाचे म्हणून ओळखलं जातं.

ब्रिटीश काळातील इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांनी पुस्तकात नोंद करत असताना आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून त्याची नोंद केली. महाराष्ट्राचा हा एक अनमोल ठेवा आहे. मात्र या अनमोल ठेव्याची किंमत प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत नाही. ग्रामस्थ झटत आहेत मात्र त्यांना यश मिळत नाही, असं इथले ग्रामस्थ आणि पेशाने शिक्षक असलेले विजय शिर्के सांगतात.

तर या वडाच्या जंगलात आल्यानंतर मन प्रसन्न होतं. मात्र या ठिकाणी असलेल्या अनावश्यक झुडपांमुळे आत जाता येत नाही. आत जाता येत नसल्यामुळे इथे आलेले पर्यटक नाराजीने परत जातात, असं ग्रामस्थ मारुती शिर्के यांनी सांगितलं.


Vat Purnima : साडेपाच एकरात पसरलेलं साताऱ्याच्या म्हसवे गावातील विस्तीर्ण वडाचं झाडं

1882 साली 'फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी' या पुस्तकात या झाडीची नोंद झाली. साडे पाच एकराच्या परिसरातील या वडाच्या झाडाचं मूळ झाड नष्ट झाल्याचं सांगितलं जातं. मात्र त्या नंतरही या झाडाचा विस्तार आजही थांबलेला नाही. आजही नवीन वडाची पारंबी तयार होऊन ती जमिनीत जात आहे. यातील अनेक झाडे ही गगनाला भिडली आहेत. त्याचे टोकही दिसत नाही. प्रत्येक वटपौर्णिमेला या ठिकाणच्या वडांच्या झाडांचे पूजन करण्यासाठी पंचक्रोशीतील महिला इथे येतात. असंख्य वड असल्यामुळे महिलांची आजिबात गर्दी होत नाही. आपल्या मनपसंतिच्या झाडाचं गटागटाने पूजन करतात. या गगनचुंबी वडाच्या झाडाचे आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन करणे आणि या वडांच्या पारंब्यांमधून वाट काढत फिरणे म्हणजे या गावातील सौभाग्यवतींचे भाग्यच.

ऐतिहासिक ठेवा असलेलं हे वडाचं झाड सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. या झाडाची शासनाने दखल घेऊन याला पर्यटनाचा 'क' दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत, पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत.

राज्याबाहेर अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत जिथे प्रशासकीय यंत्रणेच्या पुढाकाराने तयार केली आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना येण्यास भाग पाडलं जात. मात्र महाराष्ट्रातील ही अशीही काही स्थळं आहेत की त्याची नोंद इंग्रजांनी करुन ठेवली, मात्र आपल्या प्रशासकीय यंत्रणेला जागं करता करता या गावाची अख्खी पिढीच्या पिढी संपली. आता प्रश्न पडतो आणखी किती पिढ्या हे राज्यकर्ते, प्रशासन संपवणार? 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget