एक्स्प्लोर

ST Strike : एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

शिक्षणाच्या नुकसानावर उच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत व्यक्त केली आहे. समितीसमोर संपकरी संघटनांना बाजू मांडण्याचे निर्देश.

ST Strike : थकित वेतनवाढ, एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाकाळानंतर शाळा, महाविद्यालयं आता सुरू झाली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची एसटीअभावी हाल होत असून त्यांच्या शिक्षणाचं मोठ नुकसान होत असल्याची खंत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. तसेच संपकरी संघटनांना तीन सदस्यीय समितीसमोर बाजू मांडण्याचे तसेच या समितीला तीन आठवड्यांत आपला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. 

राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असून एसटी तोट्यात असल्याचं कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ कर्मचाऱ्यांना नजीकच्याकाळात दिलेली नाही. कोरोना संकटकाळात 306 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, आर्थिक विवंचनेतून अनेकांनी केलेल्या आत्महत्या अशी बिकट परिस्थिती असतानाही सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णत्वास नेत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, अशी मागणी करत संघटनेकडून संप पुकारण्यात आला आहे. 

मात्र त्याविरोधात महामंडळानं मुंबई उच्च न्यायालयात तातडीनं रीट याचिका दाखल करत हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा करत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिकाही दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. तेव्हा, त्यावर कामगारांच्या आंदोलनाला विव स्तरातून पाठींबा मिळत असून आंदोलन शांततापूर्ण व न्यायालयाच्या आदेशांचे पालन करूनच सुरू आहे. 

तसेच एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी संपावर असून कोणीही कामावर रुजू होणार नसल्याचं कामगारांच्यावतीनं स्पष्ट केलं गेलं आहे. मात्र, याकाळात 40 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती संघटनेच्यावतीनं अँड. गुणरतन सदावर्ते यांनी कोर्टाला दिली. त्यावर जीवनाचे मूल्य इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा मौल्यवान असल्याचे आम्ही मागील सुनवाणीमध्ये सांगितले होते. संपकऱ्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा, टोकाचे पाऊल उचलू नये, असेही न्यायालयाने पुन्हा एकदा नमूद केले. सुनावणीदरम्यान एका पीडितेनं कोर्टापुढे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करून अर्ज दाखल करावा, तोंडी बाजू मांडू नये, असे निर्देश न्यायालयाने पीडितेला दिले आहेत.

संपाचा ग्रामीण भागावर परिणाम
या संपाचा ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून खेडेगावातील विद्यार्थांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे आधीच दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले असताना आणखी नुकसान होता कामा नये. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे एसटी बससेवा सुरू राहायला हवी, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.

इच्छुकांना अडवू नये
कर्मचारी संघटनेने हिंसक आंदोलन करणार नसल्याची हमी न्यायालयाला दिली आहे. ती यापुढेही पाळली जाईल व सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या वाहतूक सेवेत ते कोणताही अडथळा आणणार नाहीत, अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच एसटीचे चालक, वाहक काम करण्यास इच्छुक असतील त्यांना अडवू नये, तसा प्रयत्न करून हिंसक आंदोलन करण्याच प्रयत्न केल्यास सरकारने गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहेत.

आझाद मैदानात डॉक्टर तैनात
आझाद मैदानात शेकडोच्या संख्येने कर्माचारी आंदोलन करत असून त्यांना आत्यावश्यक सेवा लागल्यास डॉक्टरांची टीम तैनात आहे का?, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर आझाद मैदान इथं दोन रुग्णवाहिन्या, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तैनात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. तेव्हा, एस.टी. संपात नक्षलवादी चळवळीशी संबंधित पत्रक वाटण्यात आली असल्याचा दावा अँड. सदावर्ते यांनी केला आणि सदर पत्रक न्यायालयात सादरही केले. त्याबाबत पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने सदावर्तेंना दिले आहेत.

सर्व संघटना स्वतंत्रपणे बाजू मांडणार
वेतनवाढ आणि विलिनीकरणासह आपल्या विविध मागण्या सर्व संघटना त्रिसदस्यीय समितीसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. सदर समितीने संघटनांची बाजू ऐकून घेत त्यांचा प्राथमिक अहवाल सादर करावा असे निर्देश देत सुनावणी 20  डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Weather Forecast : मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?
मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Bacchu Kadu on Eknath Shinde CM: 'महाराष्ट्रात आज सर्व्हे केला तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल'; बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'महाराष्ट्रात आज सर्व्हे केला तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल'; बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Nandurbar Bird Flu : नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक! केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा पाहणी दौरा, तब्बल 4 लाख 4 हजार कोंबड्यांचे कलिंग
नंदुरबारच्या नवापूरमधील 9 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक! केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा पाहणी दौरा, तब्बल 4 लाख 4 हजार कोंबड्यांचे कलिंग

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
Parth Pawar and Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Embed widget