एक्स्प्लोर

92व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आजच्या दिवशी कविता वाचन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आजच्या दिवशी कविता वाचन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्य संमेलनात निरनिराळ्या प्रकाशकांच्या स्टॉलवर गर्दी पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोक इथे सहभागी होताना दिसून येत आहेत. आवडत्या विषयांवरील पुस्तक खरेदीही सुरू आहे. संमेलन स्थळी गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यामधील छोट्या छोट्या गावांमधून लोकं इथे सहभागी होण्यासाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रीत करण्यात आलं होत. मात्र विरोध झाल्याने आयोजकांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केलं होतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेक मान्यवरांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केल्याने संमेलनावर बहिष्कार टाकला होता. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी संमेलनापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मोठ्या वादांनंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे आणि मावळते संमेलनाध्याक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल प्रकरणावर आयोजकांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील कार्यक्रमातही नयनतारा सहगल यांचा आमंत्रण रद्द केल्याबद्दल निधेष व्यक्त करण्यात आलं. काल काळ्या फिती घालून साहित्यिकांनी कवितेचं वाचन केलं आणि नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्याचा निषेध नोंदवला. काय आहे वाद? या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती. सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला होता. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे, असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले होते. आपण झुंडशाहीला बळी पडलो : लक्ष्मीकांत देशमुखांचे घणाघात नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला होता. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
Eknath Shinde : उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!
उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
Embed widget