एक्स्प्लोर

शिवस्मारकासाठी तीन वेगवेगळ्या जागांचे प्रस्ताव!

शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेत सिद्धेश पवारचा मृत्यू झाल्यानंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून समोर आली आहे तर माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी आपली मुंबई या संस्थेद्वारे स्मारक भाऊच्या धक्क्यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मात्र हे स्मारक आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र स्मारक नियोजित जागीच करावे असे मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
शिवस्मारकच्या वैधतेबाबत विविध संस्थांचे अहवाल सरकारच्या दबावाखाली : राव
 यासाठी त्यांनी प्रस्तावित शिवस्मारक स्थळाभोवतीची समुद्राची भौगोलिक परिस्थिती आणि नेव्हीगेशन रूटचा दाखला दिला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही राव यांनी केला आहे. शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे.
रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर स्मारक करा: संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून अनेक वर्षे होत असली तरी आताची स्मारकाची जागा आम्ही सुचविलेली नाही.आम्ही एस्सेल वर्ल्ड जवळील जागा आणि बांद्र्याची एक जागा सुचवली होती. मात्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ती जागा सुभाष घईंना देण्यात आल्याचे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाज महाराजांचे स्मारक समुद्रात होण्याऐवजी रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर व्हाव आशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून त्यांनी केलीय. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांच संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाला पुरेसा निधी देण्यात येउन त्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागले. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेनंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget