एक्स्प्लोर

शिवस्मारकासाठी तीन वेगवेगळ्या जागांचे प्रस्ताव!

शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेत सिद्धेश पवारचा मृत्यू झाल्यानंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून समोर आली आहे तर माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी आपली मुंबई या संस्थेद्वारे स्मारक भाऊच्या धक्क्यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मात्र हे स्मारक आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र स्मारक नियोजित जागीच करावे असे मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
शिवस्मारकच्या वैधतेबाबत विविध संस्थांचे अहवाल सरकारच्या दबावाखाली : राव
 यासाठी त्यांनी प्रस्तावित शिवस्मारक स्थळाभोवतीची समुद्राची भौगोलिक परिस्थिती आणि नेव्हीगेशन रूटचा दाखला दिला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही राव यांनी केला आहे. शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे.
रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर स्मारक करा: संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून अनेक वर्षे होत असली तरी आताची स्मारकाची जागा आम्ही सुचविलेली नाही.आम्ही एस्सेल वर्ल्ड जवळील जागा आणि बांद्र्याची एक जागा सुचवली होती. मात्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ती जागा सुभाष घईंना देण्यात आल्याचे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाज महाराजांचे स्मारक समुद्रात होण्याऐवजी रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर व्हाव आशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून त्यांनी केलीय. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांच संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाला पुरेसा निधी देण्यात येउन त्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागले. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेनंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget