एक्स्प्लोर

Sadabhau Khot : सदाभाऊंच्या नेतृत्वात उद्यापासून 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' अभियान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार चर्चा

राज्यातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे.

Sadabhau Khot : सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर, युवकांसमोर, शेतमजुरांसमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात 29 एप्रिल म्हणजे उद्यापासून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या अभियानामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील होणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
 
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ,  अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई सुरु आहे. आमची लढाई ही आता इंडियावाल्यांशी असल्याचे खोत म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सध्या शेतकऱ्यांसमोर काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहोत. युवकांचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, व्यावसायिकांचे प्रश्न काय आहेत यासंबंधीची माहिती घेणार आहोत. कोरोनाच्या काळात शेतकरी, शेतमजुर, उद्योजक, तरुण याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे खोत म्हणाले. राज्याचे राजकारण पाहता हे विषय अडगळीतच पडले आहेत. स्पर्धा परीक्षा वेळेत झाल्या नाहीत. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळे झाले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण आत्महत्या करत आहेत. याकडे सरकारचे लक्ष नसल्याचे खोत म्हणाले. पिकासानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. फळबागा भाजीपाला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न , सध्या अनेक ठिकाणी ऊस शिल्लक राहण्याची स्थिती निर्माण झाल्याचे खोत म्हणाले.

दरम्यान, या अभियानात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बोलावले तरी मी त्यांच्याजवळ जाणार आहे. तसेच भाजपचे आमदार, घटक पक्षाचे कार्यकर्ते यांच्याबरोबर देखील चर्चा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या अभियानात शेतकऱ्यांचे, तरुणांचे, व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी  दिवसातून तीन चार बैठका घेणे, तसेच पत्रकार परिषदा घेणार आहोत. तसेच दिवसातून एक दोन गावात जाहीर सभा घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. 23 मे पर्यंत हे अभियान चालणार आहे. 23 मे ला तुळजापुरात तुळजा भवानीचे दर्शन घेऊन घोषवारा मांडण्यात येणार आहे. तसेच या अभियानाचा समारोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Embed widget