एक्स्प्लोर

Maharashtra Rain : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार, मात्र, मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा

उद्यापासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे.

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार 14 सप्टेंबरपर्यंत अपेक्षित असलेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढीव तीन दिवस म्हणजे 15, 16 आणि 17 सप्टेंबरपर्यंत व्यापक वातावरणीय प्रणालीमुळं टिकून राहिला. परंतू यापुढे पावसाचा अंदाज नेमका कसा असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. उद्यापासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.

मुंबईसह संपूर्ण कोकणात पाऊस पडण्याची शक्यता

आता यापुढं कोकण, विदर्भ वगळता, मराठवाड्यात आजपासूनच आठवडभर तर मध्य महाराष्ट्रात 18 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. शुक्रवार ( 23 सप्टेंबरपर्यंत) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवत आहे. असे असले तरी, मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्ह्यात मात्र जोरदार पडत असलेल्या पावसाचे सातत्य आणि शक्यता अजूनही कायम आहे. कदाचित सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत तीव्रता टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे. विदर्भात येत्या दोन ते तीन दिवस जरी सध्या काहीशी उघडीप जाणवली तरी सोमवार (19 सप्टेंबरपासून) पुन्हा विखुरलेल्या स्वरुपात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. 

दरम्यान, शनिवार (24 सप्टेंबरपासून) कदाचित पुढील सहा दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत (29 सप्टेंबर ) संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाट व गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. राजस्थानमधील वायव्य टोकाच्या भागात परतीच्या पावसाचे वेध लागण्याची शक्यता असली तरी सप्टेंबर महिना अखेरीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाऱ्यांची दिशा बदलून परतीच्या पावसाचे वारे वाहू लागतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कशामुळं एवढा पाऊस कोसळला?      

आजपासून पुढील चार दिवस (19 सप्टेंबरपर्यंत) हिमालयातील बद्री-केदार पर्यटकांना  हिमालय चढाईत घातक विजा, गडगडाटसह अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार पर्यटकांनी नियोजनात बदल करावा असे खुळे यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसात मान्सूनचा आस त्याच्या मूळ सरासरीच्या जागेपासून खूपच दक्षिणेकडे सरकल्यामुळं पाऊस पडत आहे. आठवड्यापूर्वी शुक्रवारी (9 सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीसमोर तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे तसेच त्याचे वायव्य दिशेकडे देशाच्या मध्य भू-भागावर  झालेल्या मार्गक्रमणामुळं हा जोरदार पाऊस कोसळला आहे.  
 

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Buldhana Crime News: डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget