एक्स्प्लोर

...त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं; एअरक्राप्ट प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले  

C 295 Transport Aircraft : नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प (C 295 transport aircraft) बडोद्यात होणार आहे. 22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पावरून आता विरोधकांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. पण एवढा मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यामुळं हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचं  दिसतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.  

नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, आता या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे फॉक्सकॉननंतर दुसरा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.  

"वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. परंतु, त्यांना हे जमलं नाही. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळात देखील साडे सहाशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. परंतु, आता दोन्ही सरकारं त्यांचीच असताना महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. दिल्लीला अनेकवेळा आपल्या स्वत:साठी जातात त्यावेळी याबाबत बोललं पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे सरकारचे गेल्या शंभर दिवसात महाराष्ट्रावर उपकार केले आहेत. महाराष्ट्राच्या हिताचा असलेला वेदांता गुजरातला पाठवला, बल्क ड्रग पार्क देखील महाराष्ट्राच्या हातून गेला. आता एअरबस प्रकल्प देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय. हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेला. आता हा प्रकल्प बाहेर पाठवून शिंदे सरकारने देखील महाराष्ट्राचं भलं केलं असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. 

"मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्राच्या हिताचं गुजरातला पाठवण्याचं पाप एकनाथ शिंदे यांनी केलंय. या पापाचा धडा जनता शिकवेल. सरकारचं अपयश आहेच पण सरकारची लाचारी देखील महत्त्वाची आहे . मुख्यमंत्री पदासाठी इतर लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि लाचारी पत्करली. आता याच लाचारीच्या पोटी हे सगळं घडतंय, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असा टोला तपासे यांनी लगावलाय.  "वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत आहेत.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता आणि गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे. 

दरम्यान, युकेच्या पंतप्रधान लीज यांनी जसा राजीनामा दिला तसा महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील हा प्रक्लप गुजरातला गेल्यामुळे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मात्र याचे खापर महाविकास आघाडीवरच फोडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला नाही. त्यांनी याबाबत एकही पत्रव्यवहार केला असेल तर त्यांनी तो दाखवावा अन्यथा राज्यातील जनतेची माफी मागावी.  सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातला गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका  केशव उपाध्ये यांनी केली आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget