![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjay Raut : पक्षाचं चिन्ह गेलं, नाव गेलं तरीसुद्धा 68 हजार मतं मिळाली, किर्तीकरांचा मुलगा आमच्यासोबतच : संजय राऊत
आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलं, तरीही अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आमचा मोठ्या फरकानं विजय झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
![Sanjay Raut : पक्षाचं चिन्ह गेलं, नाव गेलं तरीसुद्धा 68 हजार मतं मिळाली, किर्तीकरांचा मुलगा आमच्यासोबतच : संजय राऊत Sanjay Raut News Gajanan Kirtikar going to Shinde group will not shock our party Sanjay Raut : पक्षाचं चिन्ह गेलं, नाव गेलं तरीसुद्धा 68 हजार मतं मिळाली, किर्तीकरांचा मुलगा आमच्यासोबतच : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/11/bbe6642d5b9941db43b751fd1da5917e1668167408912290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलं, तरीही आमचा मोठ्या फरकानं विजय झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या निवडणुकीत जनतेनं आम्हीला 68 हजार मतं दिल्याचे राऊत म्हणाले. खासदार गजाजन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षावर त्यांच्या जाण्याचा काही परिणाम होणार नसल्याचे राऊत म्हणाले. ते जरी तिकडे गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हे आमच्यासोबत आहेत आणि राहतील असे राऊत म्हणाले. मला तुरुंगात टाकले तरीसुद्धा मी पार्टीसोबत आहे. संकटात पार्टीबरोबर जे असतात त्यालाच निष्ठा म्हणतात असेही राऊत म्हणाले.
गजानन किर्तीकर यांना पक्षानं काय दिलं नाही
गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. पक्षानं त्यांना काय दिलं नाही. ते पाच वेळा आमदार राहिले आहेत, तर दोन वेळा पक्षाकडून त्यांना खासदारकी मिळाली. दोन वेळा त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होता असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर के कडवट शिवसैनिक आहेत, ते पक्षाबरोबरच असल्याचे राऊत म्हणाले. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते ज्यावेळी सर्व काही भोगून पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते असे राऊत म्हणाले. फार काही सळसळ झाली असा भाग नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरुन जातील असेही राऊत म्हणाले. किर्तीकर गेल्याचा पक्षाला कोणताही धक्का नाही. 13 खासदार आत्तापर्यंत शिंदे गटात दाखल झाले आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले की ते पुन्हा निवडून येतात का ते बघू. एकनाथ शिंदे यांची दिशी बरोबर आहे की चूक आहे याचा फैसला जनता करेल असेही राऊत म्हणाले.
पंतप्रधान, राष्ट्रपती असतील त्यांचा सम्नान राहिला पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊ नका अस अनेकवेला उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे गजानन किर्तीकर म्हणाले होते. यावर संजय राऊतांना विचारण्यात आले, त्यावेळी राऊत म्हणाले की, राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात ते आम्ही घेत असल्याचे राऊत म्हणाले. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आमच्या पक्षाचं चिन्ह गेलं, नाव गेलं तरीसुद्धा जनतेनं आम्हाला भरपूर मतं दिल्याचे राऊत म्हणाले. ये सही दिशा असल्याचेही ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील त्यांचा सम्नान राहिला पाहिजे. राष्ट्रपती यांच्याबाबत जर कोणी चुकीचं वक्तव्य केलं असेल तर आमच्या पार्टीचं त्याला समर्थन नसल्याचे राऊत म्हणाले. काल भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे हातात हात घालून चालत होते. लोकशाही वाचवण्यासाठी, स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी याच्यातून देशाला मोठा संदेश गेल्या असल्याचेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut: संजय राऊतांचा माझा कट्ट्यावर दावा, 'बंडखोर आमदार नक्कीच परतणार, त्यांना जाण्याची गरज नव्हती'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)