एक्स्प्लोर

संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, संभाजीराजेंच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नागपूर : 'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, अशी स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजीराजेंना म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवारी यांनी बोलून दाखवली.

'ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा' संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पाच-सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संभाजीराजे माझ्या शेजारी बसले होते. ते म्हणाले तुम्ही ओबीसी नेते आहेत. पण तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता? यावर आम्ही कुठे विरोध करतोय, आम्ही विरोध करायचा विषयच नाही, असं उत्तर दिलं. तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर तुम्ही आताचा आमचा 27 टक्के कोटा आहे, त्यात तुम्ही 12 टक्के जोडून घ्या आणि तुमचा वेगळा संवर्ग करुन घ्या. 27 टक्के कोट्यामध्ये ओबीसीसाठी 19 टक्के, धनगर, वंजारी, भटक्या जाती, विमुक्त जमाती यांच्या हे सगळे मिळून आठ टक्क्यांचा समावेश आहे. या 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडल्यावर 39 टक्के होतात. यात एससी-एसटीचं आरक्षण मिळवलं तर ते 50 टक्क्यांच्या वर जातं. पुन्हा तोच विषय आडवा आला. आमच्या वाट्याचं तुम्ही घेऊ नका. हा समाज अत्यंत गरीब आहे. अनेकांना राहायला घर नाही, शिक्षणाचं प्रमाण 7 टक्के आहे. त्यात तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय का करता, आम्ही अन्याय करत नाही. तुम्हाला ओबीसीमध्ये प्रवेश हवा असेल तर 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडा, हे मी महाराजांशी चर्चा करताना बोललो होतो."

महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, याचा खेद : वडेट्टीवार संभाजीराजेंचा गोंधळ झाला का या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहित नाही. माझं वक्तव्य, माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, अंस आम्ही वारंवार सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. ज्या शाहू महाराजांनी शोषितांसाठी, गरिबांसाठी आरक्षणाची तजवीज केली, त्यांच्या वंशज केवळ मराठा समाजासंदर्भात वक्तव्य करत आहे, असा मेसेज जाऊ नये हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आमची भूमिका ही मराठ्यांच्या, मराठा समाजाच्याविरोधात आहे, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर वेगळं मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा, असं स्पष्टपणे मी महाराजांशी बोललो. पण महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत त्यामुळे मला खेद वाटतोय."

Exclusive | 'वडेट्टीवार खाजगीत म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीत घ्या' : संभाजीराजे छत्रपती

'संभाजीराजेंकडून लढाईची धार बोथट करण्याचा प्रयत्न' संभाजीराजेंनी आपलं नाव घेऊन असं वक्तव्य का केलं असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, "खासगी चर्चा केली तर ते विषय सार्वजनिक करु नये हे आपण पाळतो. तरीही महाराज असं बोलत असतील की वडेट्टीवार ओबीसी नेता म्हणून लढत आहे तर ती धार बोथट व्हावी आणि ओबीसी समाज वडेट्टीवारांच्या विरोधात उभा व्हावा, ही त्यांच्या मनातली कदचित इच्छा असवी किंवा राजकारण असावं किंवा त्यांची खेळी असावी, असं मला वाटतं."

'ओबीसी समाजासाठी लढेन, मंत्रिपद महत्त्वाचं नाही' "मी ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता, ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी समाजाचं वाईट होऊ देणार नाही. ओबीसी समाजासाठी मी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्यायाची गरज आहे, ती लढाई मी लढणार आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

एमपीएससीच्या पुढच्या तारखांबद्दल अद्याप निर्णय नाही सध्या तरी 11 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या दोन परीक्षांसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आता परीक्षा ढकलताना जी तारीख निश्चिक कराल ती पुढे ढकलू नका. वारंवार तारखा बदलून समाजाचं नुकसान होता कामा नये. पुढच्या दोन तारखांबद्दल चर्चा होणं बाकी आहे. चर्चेनंतरच निर्णयापर्यंत येऊ. या परीक्षांच्या तारखा पुढच्या महिन्यात आहेत. त्यावेळी कोविडची परिस्थिती आणि राज्यातील स्थिती पाहूनच चर्चा आणि निर्णय होईल.

Sambajiraje on Vadettiwar | ओबीसीमध्ये का येत नाही? विजय वडेट्टीवारांची विचारणा; संभाजीराजेंचा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Embed widget