एक्स्प्लोर

संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, संभाजीराजेंच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नागपूर : 'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, अशी स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजीराजेंना म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवारी यांनी बोलून दाखवली.

'ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा' संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पाच-सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संभाजीराजे माझ्या शेजारी बसले होते. ते म्हणाले तुम्ही ओबीसी नेते आहेत. पण तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता? यावर आम्ही कुठे विरोध करतोय, आम्ही विरोध करायचा विषयच नाही, असं उत्तर दिलं. तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर तुम्ही आताचा आमचा 27 टक्के कोटा आहे, त्यात तुम्ही 12 टक्के जोडून घ्या आणि तुमचा वेगळा संवर्ग करुन घ्या. 27 टक्के कोट्यामध्ये ओबीसीसाठी 19 टक्के, धनगर, वंजारी, भटक्या जाती, विमुक्त जमाती यांच्या हे सगळे मिळून आठ टक्क्यांचा समावेश आहे. या 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडल्यावर 39 टक्के होतात. यात एससी-एसटीचं आरक्षण मिळवलं तर ते 50 टक्क्यांच्या वर जातं. पुन्हा तोच विषय आडवा आला. आमच्या वाट्याचं तुम्ही घेऊ नका. हा समाज अत्यंत गरीब आहे. अनेकांना राहायला घर नाही, शिक्षणाचं प्रमाण 7 टक्के आहे. त्यात तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय का करता, आम्ही अन्याय करत नाही. तुम्हाला ओबीसीमध्ये प्रवेश हवा असेल तर 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडा, हे मी महाराजांशी चर्चा करताना बोललो होतो."

महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, याचा खेद : वडेट्टीवार संभाजीराजेंचा गोंधळ झाला का या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहित नाही. माझं वक्तव्य, माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, अंस आम्ही वारंवार सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. ज्या शाहू महाराजांनी शोषितांसाठी, गरिबांसाठी आरक्षणाची तजवीज केली, त्यांच्या वंशज केवळ मराठा समाजासंदर्भात वक्तव्य करत आहे, असा मेसेज जाऊ नये हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आमची भूमिका ही मराठ्यांच्या, मराठा समाजाच्याविरोधात आहे, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर वेगळं मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा, असं स्पष्टपणे मी महाराजांशी बोललो. पण महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत त्यामुळे मला खेद वाटतोय."

Exclusive | 'वडेट्टीवार खाजगीत म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीत घ्या' : संभाजीराजे छत्रपती

'संभाजीराजेंकडून लढाईची धार बोथट करण्याचा प्रयत्न' संभाजीराजेंनी आपलं नाव घेऊन असं वक्तव्य का केलं असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, "खासगी चर्चा केली तर ते विषय सार्वजनिक करु नये हे आपण पाळतो. तरीही महाराज असं बोलत असतील की वडेट्टीवार ओबीसी नेता म्हणून लढत आहे तर ती धार बोथट व्हावी आणि ओबीसी समाज वडेट्टीवारांच्या विरोधात उभा व्हावा, ही त्यांच्या मनातली कदचित इच्छा असवी किंवा राजकारण असावं किंवा त्यांची खेळी असावी, असं मला वाटतं."

'ओबीसी समाजासाठी लढेन, मंत्रिपद महत्त्वाचं नाही' "मी ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता, ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी समाजाचं वाईट होऊ देणार नाही. ओबीसी समाजासाठी मी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्यायाची गरज आहे, ती लढाई मी लढणार आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

एमपीएससीच्या पुढच्या तारखांबद्दल अद्याप निर्णय नाही सध्या तरी 11 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या दोन परीक्षांसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आता परीक्षा ढकलताना जी तारीख निश्चिक कराल ती पुढे ढकलू नका. वारंवार तारखा बदलून समाजाचं नुकसान होता कामा नये. पुढच्या दोन तारखांबद्दल चर्चा होणं बाकी आहे. चर्चेनंतरच निर्णयापर्यंत येऊ. या परीक्षांच्या तारखा पुढच्या महिन्यात आहेत. त्यावेळी कोविडची परिस्थिती आणि राज्यातील स्थिती पाहूनच चर्चा आणि निर्णय होईल.

Sambajiraje on Vadettiwar | ओबीसीमध्ये का येत नाही? विजय वडेट्टीवारांची विचारणा; संभाजीराजेंचा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget