एक्स्प्लोर

Shahajibapu Patil : पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीत पाणी सोडा, पिकांची तहान भागवा; आमदार शहाजीबापूंची मागणी

Shahajibapu Patil : पुणे (Pune) जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात (Ujani dam) पाणी सोडण्याची मागणी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली आहे.

Shahajibapu Patil : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नागरिकांची आणि पिकांची तहान भागवण्यासाठी पुणे (Pune) जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात (Ujani dam) पाणी सोडण्याची मागणी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत. शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शहाजीबापू पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. 

सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांचं आंदोलन

नीरा उजवा कालव्यातून पाणी पाळी देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात आमदार शहाजीबापू पाटील हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन नीरा उजवा कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी पाळी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपोषण थांबवण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील पाच धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी पाणी सोडा

सोलापूर जिल्ह्यात सध्या बिकट परिस्थिती आहे. पाऊस न झाल्यानं उजनी धरणात पाणी साठू शकले नाही. गेल्यावेळी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी शेतीसाठी कालव्यातून एक आणि पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांनी पिण्याचा कोटा राखीव ठेऊन पाणी सोडण्याबाबत भूमिका घेतली होती. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी एक पाण्याची पाळी आणि सोलापूरसह पंढरपूर, सांगोला आणि इतर नगरपालिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून पाणी द्यायचे झाल्यास यासाठी 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या उजनी धरणातून एवढे पाणी सोडणे शक्य नसल्याने पुणे जिल्ह्यातील पाच धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी आणि उजनीतून चार टीएमसी पाणी दिल्यास पिकांची आणि माणसांची तहान भागू शकेल असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 

15 दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार 

पाणी प्रश्नाबाबत कालवा सल्लागार समितीची 2 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीत पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे आमदार शहाजीबापू यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. येत्या 15 दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याबाबत आम्ही शासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.         

दरम्यान, उजनी धरणाच्या वरील बाजूस पुणे जिल्ह्यात मुळा मुठा, उपखोऱ्यातील खडकवासला, टेमघर, पानशेत, मुळशी, पवना ही धरणे आहेत. तर घोड उपखोरऱ्यात पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चीलेवाडी आणि घोड ही धरणे तर भीमा उपखोऱ्यातील कलमोडी, वडिवले, चासकमान , आंध्रा आणि भामा आसखेड अशी लहान मोठे 18 धरणे आहेत. ही धरणे भरल्याशिवाय हे पाणी उजनी धरणात येत नाही. दुर्दैवाने ज्यावेळी पूरस्थिती असते तेव्हा मात्र पुणे जिल्ह्यातील धरणातून पुराचे  पाणी उजनीत सोडून दिले जाते. यामुळं सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागाला पुराचा फटका सोसावा लागतो. मात्र, दुष्काळी परिस्थितीच्या वेळी उजनी धरणात पाणी सोडताना नेहमीच अडचणी आणल्या जातात. 

महत्त्वाच्या बातम्या:

Solapur News : उजनी धरणाने गाठला तळ, सोलापूरसह अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
Embed widget