एक्स्प्लोर

Solapur News : उजनी धरणाने गाठला तळ, सोलापूरसह अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर?

Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाने तळ गाठल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे अनेक गावांच्या पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

Solapur News : सोलापूर (Solapur) , नगर आणि पुणे जिल्ह्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणाने (Ujani Dam) तळ गाठला आहे. पाऊस लांबल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळी महिनाभर आधीच वजा स्थितीत गेली होती. सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 36 टक्के पर्यंत खालावला आहे. त्यामुळे तात्काळ जलाशयातील पाणी उपशावर निर्बंध न आणल्यास  पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण वजा 30 टक्के कमी पाणी पातळीत असल्याने आणखी चिंता वाढल्याचं चित्र आहे. 

उजनी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डूवाडी, बार्शी, जेऊर, करमाळा , उस्मानाबाद , राशीन, कर्जत, दौंड, इंदापूर, भिगवण आणि बारामती शहराचा काही भाग याच उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. याशिवाय नदीकाठची 100 गावे आणि जलाशय शेजारी असणाऱ्या 81 गावांचा पाणीपुरवठा देखील उजनीवर अवलंबून आहेत. शिवाय 10 ते 12 साखर कारखाने आणि 6 ते 7 औद्योगिक वसाहतीला देखील उजनी धरणातून पाणी पुरवठा होत असतो. 

मात्र जलाशयाची पाणी पातळी घटू लागल्याने याचा फटका या शहरांना आणि पाणीपुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना बसणार आहे. सध्या सोलापूर, पंढरपूर, सांगोला वगैरे शहरांना नुकताच उजनीतून पाणी पुरवठा केल्याने पुढील दीड ते दोन महिने या गावांची तहान भागली आहे. मात्र आता जसा जसा जलसाठा कमी होत जाईल तसे या शहरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

कोणत्या शहराला कसा बसणार फटका? 

उजनी धरणातील पाणी पातळीत घट झाल्यास सगळ्यात पहिला फटका हा जेऊर आणि 29 गावांना बसणार आहे.  जर धरणातील पाणीसाठा वजा 44 टक्के झाला तर करमाळा , राशीन , कर्जत या गावांना मिळणे बंद होईल. त्यानंतर धरणातील पाण्याची पातळी 56 टक्क्यांपर्यंत घसरली तर सोलापूर शहर,  बार्शी, कुर्डुवाडी आणि टेंभुर्णी या शहरांना  फटका बसणार आहे . जर धरण 62 टक्के पर्यंत खलावले तर धाराशिवच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. धरण वजा 73 टक्केवारी गेल्यास इंदापूर ,बारामती एमआयडीसी यांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे .

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वत:चा कोणताही शाश्वत स्त्रोत महापालिकेकडे उपलब्ध नाही. पाऊस लांबल्याने आता नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी उपशाला  पूर्ण निर्बंध आणल्यास जवळपास  30 ते 32 लाख नागरिकांच्या पिण्याक्या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.  मात्र याबाबत तातडीने निर्णय घ्यावे लागणार असून पाणी उपसा बंद झाला तर पाऊस सुरू होईपर्यंत चिंता राहणार नाही.

तर आगामी 25 ते 30 दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास धरणातून नदीद्वारे पाणी सोडावे लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता या भागातील सर्वांना पावसाची प्रतिक्षा आहे. धरणात सध्या मृत पाणीसाठा 44 टीएमसी आहे, पण त्यात 14 ते 14 टीएमसी गाळ आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Embed widget