एक्स्प्लोर

Ravish Kumar : रवीश कुमार यांची सडेतोड मुलाखत; नेमका का दिला NDTV राजीनामा?

Ravish Kumar : ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी एबीपी माझाशी (ABP Majha) संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

Ravish Kumar : मी एनडीटीव्ही (NDTV) सोडल्यानंतर तिथे खूप बदल झाले आहेत. त्या ठिकाणी भाजपचे प्रवक्ते येत आहेत. ते तिथे का येत आहेत? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी उपस्थित केला. एनडीटीव्हीचा राजीनामा देण्याचा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितले. रवीश कुमार यांनी एबीपी माझाशी (ABP Majha) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सरकारचे कौतुक करायला धाडस असावं लागतं असं उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एका मुलखातीत सांगितले होते. याचा अर्थ काय? असेही ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी आम्ही उद्योग करत असल्याचे प्रत्येक उद्योगपती सांगतात. मात्र, त्यांच्या उद्योगातून काय होतेय ते आपल्याला माहित असल्याचं रवीश कुमार म्हणाले.

मला एनडीटीव्हीचा राजीनामा द्यायचाच होता. राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक वेळेस काढलं जातेच असे नाही मात्र, तुम्हाला सोडून जाण्यास भाग पाडलं जातं असंही रवीश कुमार म्हणाले. बाकीच्या सहकाऱ्यांनी राजीनामा द्यावा किंवा न द्यावा हा त्यांचा निर्णय असल्याचे रवीश कुमार म्हणाले. राजीनामा देण्याचा माझा वैयक्तिक निर्णय नसता तर आम्ही सर्वांनी मिळून राजीनामा दिला असता असेही ते म्हणाले. रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रणव रॉय यांनी कुठलीच प्रतिक्रिया का दिली नाही? असा सवालही रवीश कुमार यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, काय बोलायचे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी काय बोलावं याबाबत मी बोलणार नसल्याचे रविश कुमार म्हणाले. अदानी यांच्याकडून प्रणव रॉय यांना काय ऑफर आली होती याबाबत मला काही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

 

अदानी आणि अंबानी यांच्यात मोठा फरक आहे

अदानी आणि अंबानी यांच्यात मोठा फरक आहे. अंबानी यांचे प्रतिनिधीत्व करणारा कोणताही व्यक्ती एनडीटीव्हीच्या संचालक मंडळात नव्हता. मात्र, आता एनडीटीव्हीमध्ये अदानी ग्रुपचे संजय पुगलिया आल्याचे रवीश कुमार म्हणाले. प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच कंपनीच्या संचालक मंडळावर तीन नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अदानी ग्रुपचे सीईओ सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्नैया चेंगलवरायन यांचा समावेश होता. अंबानी यांच्या कोणत्याही व्यक्तीचा एनडीटीव्हीच्या कामकाजात सहभाग नव्हता. आता मात्र, अदानी यांचे सहकारी संजय पुगलिया हे एनडीटीव्हीच्या मंडळात आल्याचे रविश कुमार म्हणाले.  संजय पुगलिया यांना एनडीटीव्हीचे कोणकोणते पत्रकार भेटले याबाबतची मला माहिती नाही. ही अफवा आहे की खरचं भेटले याबाबत काही कल्पना नसल्याचंही रविश कुमार यांनी सांगितलं.

गेल्या आठ वर्षात अनेक वृत्तनिवेदकांना काढण्यात आलं 

एनडीटीव्ही वृत्तसमुहाची मालकी आता प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंगमध्ये अदानी यांचे 29.18  टक्के शेअर्स आहेत. एनडीटीव्ही वृत्तसमुहाची मालकी अदानी यांच्याकडे जाण्यापूर्वीच त्यांनी एनडीटीव्हीच्या कामकाजात लक्ष घातल्याचे रवीश कुमार म्हणाले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अद्याप लोकांसमोर आल्या नाहीत. गेल्या आठ वर्षात अनेक वृत्तनिवेदकांना काढण्यात आले आहे. तर काही वृत्तनिवेदकांना सोडण्यास भाग पाडल्याचे रवीश कुमार म्हणाले. अनेक पत्रकारांना जेलमध्येही टाकण्यात आलं. काही पत्रकारांना ट्रोल करण्यात आलं, यामध्ये महिला पत्रकारांचा देखील समावेश असल्याचे रविश कुमार म्हणाले.       

सरकार खोटं बोलत असताना सत्य परिस्थिती सांगणं माझं काम

मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नव्हती म्हणूनच भाजपचे प्रवक्ते येत नव्हते असेही रविश कुमार म्हणाले. माझा प्रत्येक टीव्ही शो हा फॅक्टच्या आधारावर होता. मी कोणत्याही मुद्याचा एका बाजूने विचार केला नाही. विरोध करण्यासाठी विरोध केला नसल्याचं रवीश कुमार यांनी सांगितलं. सरकार खोट बोलत होते त्यामुळं मी सत्य लोकांसमोर ठेवल्याचे रविश कुमार म्हणाले. सरकार ज्या दिवशी खोट बोलेल त्याच दिवशी सत्य परिस्थिती सांगणं माझं काम असल्याचे रवीश कुमार म्हणाले. 

(शब्दांकन : गणेश लटके)

महत्त्वाच्या बातम्या:

Ambani-Adani : अंबानी-अदानी यांच्या महाराष्ट्रातील बड्या राजकारण्यांच्या भेटी, चर्चांना उधाण

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget