एक्स्प्लोर
Advertisement
राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरुन खडाजंगी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरुन जोरदार खडाजंगी झाली.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरुन जोरदार खडाजंगी झाली. ऊसाला एफआरपी देण्याच्या मागणीवरुन ही बाचाबाची झाली आहे.
पुण्यातील साखर संकुलात राजू शेट्टी आणि साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्यात बैठक सुरु होती. या बैठकीत एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. साखर आयुक्तांनी एफआरपी थकवलेल्या कारखान्यांच्या चेअरमनशी खासदार राजू शेट्टींचं फोनवरुन बोलणं करुन देण्यास सुरुवात केली.
त्यापैकी एक फोन उस्मानाबादच्या भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन तानाजी सावंत यांना लावण्यात आला. यावेळी तानाजी सावंत आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तानाजी सावंत हे सध्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement