एक्स्प्लोर

नितीन गडकरींचं पत्र कुणाच्या दबावाखाली? नाना पटोले यांचा सवाल, तर बच्चू कडू म्हणाले...

नितीन गडकरी हे 'विकासपुरूष' आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई :  महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नाना पटोले यांनी म्हटल की, 25 वर्ष भाजप आणि शिवसेना एकत्रित राहिले, तेव्हा तरी मंत्रीमहोदयांनी (नितीन गडकरी) कधीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसंदर्भात, शिवसेनेच्या वागणुकीबद्दल असे वक्तव्य केले नाही, पत्र लिहिले नाही. आता हे पत्र कोणाच्या तरी दबावाने, वरच्या दाढीवाल्याच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दबावात लिहिले आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

देशात महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार होत आहे, रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले जात आहेत, रस्ते प्रकल्पांची किंमत वाढवली जात आहे, त्याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे नाना पटोले म्हणाले. केंद्रीय मंत्री या मुद्द्यावर एखादी श्वेतपत्रिका काढणार का? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्यात चांगल्या दर्जाचे रस्ते झालेच पाहिजे. रस्ते प्रकल्पाचे कामकाज कोणीही अडवणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी, आपण लक्ष घालावं; नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नितीन गडकरी हे 'विकासपुरूष' आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात याला जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

वाशिममधील शिवसेना रिसोड तालुका अध्यक्ष शिवसेना महादेव ठाकरेंच्या क्लिपच्या आधारे पुरावे सादर करण्यात आले. त्याबद्दल स्वत: महादेव ठाकरे  यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. गडकरी साहेब जे रस्त्याचे काम केलं त्याला शिवसेनाचा विरोध नाही. विरोध असताच तर आम्ही जिल्ह्यातील 90 टक्के काम होऊ दिलं असतं का? जिथं शेतकऱ्याचं नुकसान, अपघात झालेत असल्या ठिकाणी आम्ही आंदोलन केले. मात्र शिवसेनेनं जिल्ह्यात कुठेच रस्त्याची कामं अडवली नाहीत. संपूर्ण आरोप खोटे असल्याचे महादेव  ठाकरे यांनी म्हटलं. 

वसूलीचे पैसे वरपर्यंत पोहोचत आहेत का?- राम कदम

नितीन गडकरी यांच्या सारख्या नेत्याला पत्र लिहून तक्रार करावी लागली यावरुन समजू शकतो की प्रकरण किती गंभीर आहे. ठाकरे सरकार वसूली सरकार आहे असा आरोप आधीपासूनच केला जातो आहे. आता विकासकामांमध्येही वसूलीची संधी यांना सोडायची नाही. वसूलीचे पैसे वरपर्यंत पोहोचत आहेत का? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. 

नितीन गडकरी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्हयात हे प्रामुख्याने घडते आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
Maharashtra Olympic Association : अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टं मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget