एक्स्प्लोर

Nisarga Cyclone | निसर्ग चक्रीवादळातून पालघर बचावलं, प्रशासनासह नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

निसर्ग चक्रीवादळातून जरी पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग वाचला असला तरीही हे वादळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या वाडा, विक्रमगड,जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागाला धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालघर: देशाबरोबर राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोना महासंकटाबरोबरच निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यात लोकांच्या उरात धडकी भरवली होती. मात्र आता निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी दुपारनंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघरला बसणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, आरोग्य विभाग, विद्युत वितरण, पोलीस प्रशासनाच्या पाच टीम जिल्ह्यातील विविध भागात कार्यरत करण्यात आल्या होत्या.
अलिबागमध्ये सकाळी मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहून समुद्रात एक जहाज अडकल्याच्या घटनेनंतर साधारणपणे दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या वेळेत हे चक्रीवादळ जिल्ह्यात धडकण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासन समुद्राकडे डोळे लावून बसले होते. अलिबागमध्ये सकाळी धडकल्यानंतर हे चक्रीवादळ जसजसे पुढे सरकत होते तसतसे पालघरवासीयांसोबत जिल्हाप्रशासनाची चिंता वाढत होती. परंतु हे वादळ अलिबागवरून पेण, नाशिक भागातून पुढे सरकू लागल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु जिल्ह्यात झाड पडण्याच्या तुरळक घटना घडल्या.
Nisarga Cyclone | निसर्ग चक्रीवादळातून पालघर बचावलं, प्रशासनासह नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
सकाळपासूनच उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सपोनि जितेंद्र ठाकूर यांनी सातपाटीसह उच्छेळी-दांडी,मुरबे,नवापूर,केळवे आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने गावा गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. किनारपट्टीवरील 22 गावातील सुमारे 16 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तोरस्कर यांनी  सांगितले. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा यांनीही सातपाटी सह अन्य गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
किनारपट्टीवरील वसई ते झाई ह्या 110 किलोमीटर अंतरावरील गावांची एनडीआरएफ पथकाने पाहणी करत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक भाग असलेल्या डहाणू, चिंचणी, नरपड, बोर्डी,सातपाटी, केळवे,मुरबे,दांडी,आदी गावातील किनाऱ्यावर आपला तळ ठोकला होता. वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील समुद्रात मासेमारीला गेलेल्या दयावान आणि प्रेमळ ह्या दोन मच्छीमार बोटी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अडकून पडल्या होत्या. साधारणपणे 20 नॉटिकल समुद्री क्षेत्रात या दोन्ही बोटीतील 30 मच्छीमार अडकून पडल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी डॉ.शिंदे ह्यांनी तात्काळ कोस्टगार्डशी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. सातपाटीमधील मच्छीमार सनी चौधरी यांनी त्या बोटींच्या वायरलेस सेटवर संपर्क साधून त्यांना सातपाटी बंदरात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारीनाईक यांनी एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतकार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले. समुद्रातील वाऱ्याचा वेग कमी झाल्याने या दोन्ही बोटी वसईमध्ये उशिराने पोहोचल्या. 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असताना पावसाळी बंदीचे आदेश डावलून या बोटी समुद्रात मासेमारीसाठी राहिल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पालघरकडून त्यांच्यावर कारवाईची शक्यता होण्याची शक्यता आहे.
या वादळाने जरी पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग वाचला असला तरीही हे वादळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागाला धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजूनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget