एक्स्प्लोर

Nisarga Cyclone | निसर्ग चक्रीवादळातून पालघर बचावलं, प्रशासनासह नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

निसर्ग चक्रीवादळातून जरी पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग वाचला असला तरीही हे वादळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या वाडा, विक्रमगड,जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागाला धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालघर: देशाबरोबर राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोना महासंकटाबरोबरच निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यात लोकांच्या उरात धडकी भरवली होती. मात्र आता निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी दुपारनंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघरला बसणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, आरोग्य विभाग, विद्युत वितरण, पोलीस प्रशासनाच्या पाच टीम जिल्ह्यातील विविध भागात कार्यरत करण्यात आल्या होत्या.
अलिबागमध्ये सकाळी मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहून समुद्रात एक जहाज अडकल्याच्या घटनेनंतर साधारणपणे दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या वेळेत हे चक्रीवादळ जिल्ह्यात धडकण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासन समुद्राकडे डोळे लावून बसले होते. अलिबागमध्ये सकाळी धडकल्यानंतर हे चक्रीवादळ जसजसे पुढे सरकत होते तसतसे पालघरवासीयांसोबत जिल्हाप्रशासनाची चिंता वाढत होती. परंतु हे वादळ अलिबागवरून पेण, नाशिक भागातून पुढे सरकू लागल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु जिल्ह्यात झाड पडण्याच्या तुरळक घटना घडल्या.
Nisarga Cyclone | निसर्ग चक्रीवादळातून पालघर बचावलं, प्रशासनासह नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
सकाळपासूनच उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सपोनि जितेंद्र ठाकूर यांनी सातपाटीसह उच्छेळी-दांडी,मुरबे,नवापूर,केळवे आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने गावा गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. किनारपट्टीवरील 22 गावातील सुमारे 16 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तोरस्कर यांनी  सांगितले. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा यांनीही सातपाटी सह अन्य गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
किनारपट्टीवरील वसई ते झाई ह्या 110 किलोमीटर अंतरावरील गावांची एनडीआरएफ पथकाने पाहणी करत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक भाग असलेल्या डहाणू, चिंचणी, नरपड, बोर्डी,सातपाटी, केळवे,मुरबे,दांडी,आदी गावातील किनाऱ्यावर आपला तळ ठोकला होता. वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील समुद्रात मासेमारीला गेलेल्या दयावान आणि प्रेमळ ह्या दोन मच्छीमार बोटी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अडकून पडल्या होत्या. साधारणपणे 20 नॉटिकल समुद्री क्षेत्रात या दोन्ही बोटीतील 30 मच्छीमार अडकून पडल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी डॉ.शिंदे ह्यांनी तात्काळ कोस्टगार्डशी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. सातपाटीमधील मच्छीमार सनी चौधरी यांनी त्या बोटींच्या वायरलेस सेटवर संपर्क साधून त्यांना सातपाटी बंदरात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारीनाईक यांनी एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतकार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले. समुद्रातील वाऱ्याचा वेग कमी झाल्याने या दोन्ही बोटी वसईमध्ये उशिराने पोहोचल्या. 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असताना पावसाळी बंदीचे आदेश डावलून या बोटी समुद्रात मासेमारीसाठी राहिल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पालघरकडून त्यांच्यावर कारवाईची शक्यता होण्याची शक्यता आहे.
या वादळाने जरी पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग वाचला असला तरीही हे वादळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागाला धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजूनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Rain : गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
Nashik Rain: नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस
नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget