एक्स्प्लोर

Nana Patole : आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला अजूनही तयार, नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर

Maharashtra Politics: : उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाकडे श्रवणाचे लक्ष लागले आहेत.

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहेत. महाविकास आघाडीशी जागावाटपाची ( Maha Vikas Aghadi Seat Sharing) चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Constituency) आपले उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले हे भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते. 

यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "मी स्वतः अकोल्यात गेलो, प्रकाश आंबेडकर यांना मी सांगितलं की, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार आहोत. हैद्राबादच्या ओवेसींनी मुस्लिमांच्या मतांचं विभाजन केलं, यांनी मागासवर्गीयांचं मतं कमी केलं. कालपण सांगून आलो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तयार आहोत. मतांचं विभाजन नको," असेही पटोले म्हणाले. 

पुढे बोलतांना नाना म्हणाले की, "त्यांनी तर माझा खूप अपमान केला. वाटाघाटीच्या बैठकीसाठी जेव्हा मी बसायचो तेव्हा माझा अपमान केला जात होता. मी काल अकोल्यात सांगितलं की, माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, हे नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे. म्हणून मी काल खुल्या मनानं अकोल्यात त्यांना आवाहन केलं. पण, त्यांच्या मनात मत विभाजनाचं, भाजपलाचं जिंकवायचं असेल तर ते त्यांच्या मनातील गोष्ट असल्याचे" नाना पटोले म्हणाले.

अन्यथा संविधानाला ठेच पोहचेल...

अजूनही या भंडाऱ्याच्या भूमीतून आवाहन करतोय, हे पाप होऊ देवू नका. हे पाप झालं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, लोकशाही जी आमच्या मागासवर्गीयांसाठी किंवा बहुजनांसाठी जो एक ग्रंथ आहे. त्या संविधानाला ठेच पोहचेल. कारण की हे 400 पार म्हणजेच चारसो बिसी करायला तयार आहे. चारसो बिसी यांनी केली तर तुम्ही आम्ही मनासारखं जीवन जगण्याचे अधिकार राहणार नाही, असेही पटोले म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Kalyan Loksabha: कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही; गणपत गायकवाडांच्या कार्यालयात ठराव मंजूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget