एक्स्प्लोर

शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली 

Mumbai High Court On Mid Day Meal : साल 2014 मध्ये हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांना केंद्र सरकारनं आव्हान दिलं होतं. 

मुंबई : शिक्षकांना मध्यान्ह भोजनाची (मिड-डे मिल) जबाबदारी देता येणार नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. शाळेतील मुलांना अन्न देण्याआधी ते तपासण्याचे, त्याची नोंद ठेवण्याचे काम मुख्याधापक व शिक्षकांना देऊ नका, असे आदेश हायकोर्टानं 27 फेब्रुवारी 2014 दिलेले आहेत. मात्र या आदेशांचा पुनर्विचार करावा व शिक्षकांना त्यांचं काम करु द्यावं, अशी मागणी केंद्र सरकारनं याचिकेतून केली होती. 

या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावर हे शिक्षकांचं कामच नाही, अस निर्वाळा एकदा न्यायालयानं दिलेला आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विचार आम्ही करु शकत नाही. या निकालाचा पुनर्विचार करण्याचं कोणतंही समाधानकारक कारण आमच्यासमोर नाही. त्यामुळे केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावत असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने नियम तयार केल्यानंतर त्याविरोधात काही महिला बचत गटांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आलेल्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्याची नोंद करुन घेत हायकोर्टानं मुख्याध्यापक व शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

मिड-डे मिल योजना -

- पहिली ते आठवीच्या मुलांसाठी मिड-डे मिल योजना 1995 मध्ये केंद्र सरकारनं सुरु केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनानं 18 जून 2009 व 2 फेब्रुवारी 2011 रोजी ठराव केला. 
- पहिली ते पाचवीच्या मुलांना 450 ग्रॅम कॅलरीज व 12 ग्रॅम प्रोटीन्स, सहावी ते आठवीच्या मुलांसाठी 700 ग्रॅम कॅलरीज व 20 ग्रॅम प्रोटीन देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला. 
- ही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र किचन असावं. या किचनमधून शाळांना मिड-डे मिल देण्याचं ठरलं. महिला बचत गटत व अन्य संघटनांना याचे कंत्राट देण्याची तरतुदही करण्यात आली. केंद्र सरकार 75 टक्के तर राज्य शासनाचा 25 टक्के सहभाग या योजनेत आहे.

केंद्र सरकारचा नियम -

22 जुलै 2013 रोजी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ही योजना राबवण्यासाठी नियमावली जाहीर केली. मुलांना अन्न देण्याआधी ते शिक्षकांनी तपासावे. त्याची नोंद करुन ठेवावी. शाळेच्या व्यवस्थापकीय कमिटीनेही अधूनमधून अन्न तपासावे व मगच विद्यार्थ्यांना द्यावे, असा नियम करण्यात आला.

राज्य शासनाचा नियम 

मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षकानं किचनला महिन्यातून किमान एकदा भेट द्यावी. तेथील स्वच्छतेचा आढावा घ्यावा. मुलांना अन्न देण्याआधी ते मुख्याधापक व शिक्षकानं तपासावं व त्याची नोंद करुन ठेवावी, असा नियम राज्य शासनानं तयार केला आहे.

हायकोर्टाचे 2014 मध्ये दिलेले आदेश -

मुख्याधापक व शिक्षकांना अन्न तपासण्याचे व त्याची नोंद ठेवण्याचे काम देऊ नका. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करा, जे किचनची तपासणी करतील. तेथील स्वच्छता तपासतील, अन्न तपासतील. हे तज्ज्ञ अन्नाचा दर्जा अधूनमधून प्रयोग शाळेत तपासतील. या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते आहे की नाही? हे तपासण्यासाठी हे तज्ज्ञ संबंधित ठिकाणी अचानक भेटही देतील, असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठानं 27 फेब्रुवारी 2014 रोजी दिले आहेत.

शिक्षण कायदा नियम 27 काय सांगतो?

शिक्षकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त कोणतीही कामे देता येणार नाही. केवळ आपत्ती निवारण जनगणना, मतदानाचे काम शिक्षकांना देता येईल.

ही बातमी वाचा : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget