एक्स्प्लोर

पूरग्रस्तांसमोर नवे संकट, सांगलीतील घरांमध्ये तब्बल 250 साप

या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सापांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी मगरी ही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.

सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सापांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे. सांगली शहर दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे जैव विविधता विपुल आहे. मगरींपासून ते 150 जातींच्या विविध पक्षांनी येथील परिसर संपन्न आहे. पण या प्रलयकारी पुराने मगरींनाही आपला अधिवास सोडावा लागला. पुरात नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले होते तर दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले आहेत. या सापांना सर्प मित्रांची मदत घेवून बाहेर काढावे लागत आहे. महापुरानंतर रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तींपासून दूर सोडण्यात आले. दोन मगरीही मानवी वस्तीत आल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पर्यावरणात सोडण्यात आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मदत केली. प्राणीमित्रांनी अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले. वन संरक्षण कायद्यानुसार साप पकडण्याबाबत निर्बंध आहेत. पण, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. नेचर कन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सापांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे. या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सापांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी मगरी ही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.
दरम्यान, कृष्णा नदीबरोबरच वारणा नदीकाठाला देखील महापुराचा मोठा फटका बसला आहे.  यामुळे या भागात देखील घराची मोठी पडझड झाली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  त्यामुळे या वारणा नदी काठी वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना मदत पोहोचविण्याचे काम औरंगाबादमधील अभ्युदय फाऊंडेशन, महात्मा गांधी मिशन परिवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि तमाम औरंगाबादकरानी दिलेल्या मदतीतून केले जातेय. कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील  वाळवा तालुक्यातील  शेवटचं टोक असलेल्या गावच्या वाड्या-वस्त्यावर या औरंगाबादमधून आलेल्या मदतीचे वाटप केले गेले. सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या वाळवा तालुक्यातील काही भागात, वाड्या वस्त्यावर देखील मदत पोहचू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget