एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'

Devendra Fadnavis: 2019 साली शरद पवार मला आणि अमित शाहांना भेटले होते, आम्ही सरकार स्थापन करणार होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई: गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.   ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते. शरद पवार (Sharad Pawar)म्हणतात की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात माझा कोणताही हात नव्हता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट (presidential rule in Maharashtra) लागली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. यामुळे महाराष्ट्रात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या होत्या. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेकी,  “भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं, परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

शरद पवारांच्या सूचनेनुसार गोष्टी घडल्या, राष्ट्रपतींकडे पाठवायचं पत्र माझ्या कार्यालयात टाईप केलं होतं: देवेंद्र फडणवीस

10 नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. त्यादरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

आणखी वाचा

आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Jayant Patil and Gopichand Padalkar: दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Drink and Drive : मद्यधुंद कारचालकाचा धुमाकूळ, जमावाकडून चालकाला कपडे फाटेपर्यंत मारहाणTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 11 June 2025 | ABP MAJHASolapur People Reaction on Liquor Rates : 500 रुपये पगार आहे 450 दारुवर जातात, दारु महागल्यानं संताप!Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Jayant Patil and Gopichand Padalkar: दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
Embed widget