एक्स्प्लोर

धक्कादायक! 3 वर्षांपासून बेपत्ता, पण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला; वृ्द्धाच्या मुलाने घेतली पोलिसात धाव

गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबई : राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठीही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली आहे. आता, या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. कारण, तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता, ती व्यक्ती 3 वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरुन, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी मुख्यमंत्र्‍यांवर टीका केलीय. 

गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या मुख्यमंत्र्यांच्या  जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते, त्यांचा कुटुंबाने सर्वत्र  शोध देखील घेतला. परंतु, तांबे कुटुंबीयांना ज्ञानेश्वर तांबे आढळून आले नाहीत,अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबीयांस धक्काच बसला आहे. याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते, आता  त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंतीही तांबे यांच्या पुत्राने केली आहे. 

सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्‍यांवर टीका

मुख्यमंत्र्‍यांनी कितीही कंठशोष करुन सांगितलं तरीही हे सरकार सर्वसामान्य नसल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांच्या कृतीतून दिसून येते. कारण, हे सरकार जाहिरातबाजी करणारं सरकार आहे, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं हे सरकार आहे. वारकऱ्यांच्या संबंधाने जी पर्यटन योजना सरकारने जाहीर केली, त्यातही स्वत:चीच पाठ थोटपून घेतली जात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी जाहिरातीवर लावण्यात आलेल्या फोटोचाही संदर्भ दिली. पुण्याच्या शिरुरमधील ज्ञानेश्वर तांबे नामक व्यक्तीचा फोटो या जाहिरातीवर लावण्यात आला आहे. मात्र, ते बेपत्ता असून तांबे कुटुंबीय गेल्या 3 वर्षांपासून शोधत होते. जेव्हा ज्ञानेश्वार तांबे यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी तक्रार केली, तेव्हा हे सरकार स्वत:च्या जाहिरातीसाठी लोकांच्या भावनांशी खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असेही अंधारे यांनी म्हटले. 

हेही वाचा

अजित पवारांच्या जीआरला सुप्रिया सुळेंचंही GR नेच उत्तर; पुण्यातील बैठकीत दादा-ताई आमनेसामने

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
IND vs PAK : भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
TCS Layoffs : टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, IT कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नेमकं काय घडतंय?
टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, नेमकं काय घडतंय?
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
Embed widget