एक्स्प्लोर

मराठा आरक्षण : राज्यातील मागास वर्ग शोधण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडेच, राज्य सरकारचा युक्तिवाद

एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्याबाबतची अधिसूचना जारी करण्याचे सर्व अधिकार हे केवळ राष्ट्रपतींना असले तरी घटनेच्या या 102 व्या दुरूस्तीबाबतचे निर्देश आणि त्याच्या वापराबाबतची यंत्रणा अजूनही स्पष्ट नाही.

मुंबई :एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्याबाबतची अधिसूचना जारी करण्याचे सर्व अधिकार हे केवळ राष्ट्रपतींना असले तरी घटनेच्या या 102 व्या दुरूस्तीबाबतचे निर्देश आणि त्याच्या वापराबाबतची यंत्रणा अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळेच त्याची वाट न पाहता राज्य सरकारनं आपल्या अधिकारात मराठा आरक्षणाचा निर्णय जारी केला आहे. याशिवाय एखाद्या समाजाला नव्यानं मागास वर्गाचा दर्जा देण्यासाठी त्याचे सर्व्हेक्षण करून आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहेच. त्यानंतरच तो समाज मागास म्हणून ओळखला जातो.
तसेच केंद्र सरकारनं 15 ऑगस्ट 2018 ला जारी केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारच्या याबाबतीतील अधिकाराला मुळीच बाधा येत नाही. त्यांचे अधिकार हे कायम असून राज्यातील मागास वर्ग शोधण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडेच असतो, असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद गुरूवारी राज्य सरकारच्यावतीनं विशेष सराकरी वकील बलविंदर सिंह पटवारीया यांनी हायकोर्टात केला.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारच्यावतीनं अॅड. पटवारीया यांनी हायकोर्टाला सांगितलं की, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास या वर्गातील आरक्षणाची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत आहे. राज्य मागास प्रवर्ग आयोगानं मराठा समाजासाठी 13  टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. मात्र राज्य सरकारनं आपल्या अधिकारात ती 16 टक्क्यांपर्यंत वाढवली. तसेच सध्या या वर्गात केवळ मराठा समाजाचा समावेश असला तरी भविष्यात आणखी काही जातींचा यात समावेश होऊ शकतो.
मात्र समाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची स्थापना करण्याऐवजी मराठ्यांना ओबीसीतच का सामावून घेतलं नाही? या हायकोर्टाच्या सवालावर पटवारीया म्हणाले की, मराठा समाजाची लोकसंख्या ही फार मोठी आहे. राज्यात सध्या 48 टक्के आरक्षण शिल्लक आहे. 30 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाचा ओबीसी वर्गात समावेश केला असता तर गोंधळ उडाला असता. त्यावर्गात सध्या असलेल्या समाजाच्या आरक्षणाच्या मर्यादेत फरक पडला असता. ज्यामुळे समाजातील असंतोषच वाढला असता. आणि सध्याच्या घडीला ३० टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकऱ्या, पदोन्नती यात पुरेसं प्रतिनिधित्व मिळतं नाही, म्हणून त्यांचा स्वतंत्र वर्ग तयार केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

OBC Maha Elgar Sabha in Beed : 'तुमचं शासन भूतकाळी राहील', बीडमधून ओबीसींचा थेट इशारा
Reservation Row : 'Jarange Patil यांना Sharad Pawar, Ajit Pawar चावी देतात', Laxman Hake यांचा थेट आरोप
OBC Maha Elgar Sabha in Beed : २ सप्टेंबरचा जीआर रद्द होणार? बीडमध्ये ओबीसींचा एल्गार
OBC Reservation Row: '...नाहीतर मग निवडणुका आहेत तर समोर', Vijay Wadettiwar यांचा सरकारला थेट इशारा
OBC Reservation Protest: 'Bhujbal साहेबांचे काही संभ्रम आहेत', Chandrashekhar Bawankule यांचे वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Kolhapur News: कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Ashish Shelar VIDEO: शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
Embed widget