एक्स्प्लोर

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा इतका धुमाकूळ कसा? यामागचं कारण काय? हवामान तज्ञ काय सांगतात?

Maharashtra Rain : ढगफुटीसारखा पाऊस का कोसळतोय? त्यामागे काय कारण?Maharashtra Weather : परतीच्या पावसाचा मुक्काम का वाढला?

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस परत जातो, पण दिवाळी आली तर अद्याप परतीचा पाऊस सुरुच आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुणे, सोलापूर, जालना आणि कोल्हापूरमधील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. यामागे काय कारण असेल... परतीचा पाऊस कधी जाणार? शहरातील पावसाचे प्रमाण का वाढले? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक आणि हवामान अभ्यासक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. डॉ. पन्हाळकर यांनी परतीचा पावसाबद्दलची उत्तरे दिली आहेत.. (शब्दांकन - नामदेव कुंभार)

Q. राज्यातील पावसाचं प्रमाण का वाढलं?

हिंदी महासागराचे (Indian Ocean) तापमान वाढलेलं आहे. याची वाढ एक डिग्री इतकी आहे. म्हणजेच इतर महासागराच्या तुलनेत हिंदी महासागराचे तापमान एक डिग्रीनं वाढलं आहे. त्याचबरोबर इंडियन ओशन डायपोल (indian ocean dipole)यामध्ये अरबी समुद्राचं आणि बंगाल उपसागर (Bay of Bengal) या दोन्ही समुद्राच्या तापमानामध्ये असलेला बदल किती प्रमाणात आहे. जर अरबी समुद्राचे तापमान जास्त असेल तर त्याला आपण इंडियन ओशन पॉझिटिव्ह डायपोल असे म्हणतो आणि ज्यावेळी बंगालच्या उपसागराचं तापमान जास्त असेल तेव्हा आपण निगेटिव्ह डायपोल म्हणतो. यावर्षी इंडियन ओशन हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसलंय. म्हणजे अरबी समुद्राचं तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, अशी माहिती सचिन पन्हाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.  

Q. महाराष्ट्रात दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस का?

महाराष्ट्रात आतापर्यंत 123 टक्के पडलेला आहे. दरवर्षीपेक्षा 23 टक्के जास्त पाऊस पडला आहे. मागील 40 ते 50 वर्षातील इतिहास पाहिला तर बंगाल उपसागरामध्ये वादळाची निर्मिती जास्त होत होती. पण आता अरबी समुद्रामध्ये जास्त वादळं निर्माण होत असल्याचं दिसतेय. लो प्रेशर एरिया निर्माण होण्याचं प्रमाणही जास्त वाढलेलं आहे. त्यामुळेच किनारपट्टी अथवा महाराष्ट्रासह केरळ आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतेय. अरबी समुद्राचं तापमान जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे लो प्रेशर बेल्ट जास्त निर्माण होतात, असे सचिन पन्हाळकर यांनी सागितलं.

Q. परतीच्या पावसाचा मुक्काम का वाढला?

परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. यावर आयएमडी आणि आयआयटीएमचे संशोधकही यावर अभ्यास करत आहेत. ला नीना (La Nina) याचं अस्तित्व निर्माण झालेलं यावर्षी दिसत आहे. ला नीना यामुळे परतीचा पाऊस अद्याप महाराष्ट्रात थांबल्याचं दिसतेय, असे सचिन पन्हाळकर यांनी सांगितलं. अरबी समुद्रामध्ये आणि अंदमानजवळ चक्रिवादळ निर्माण झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पाऊस वाढला आहे. ज्यावेळी समुद्रामध्ये चक्रिवादळाची निर्मिती होते, तेव्हा परतीचा पावसाचा मुक्काम वाढतो. 4 ते 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जायला हवा. पण अद्याप परतीचा पाऊस कायम असल्याचे दिसत आहे. तसेच वाऱ्याची दिशाही अद्याप बदलेली नाही, असेही सचिन पन्हाळकर यांनी सांगितलं.

Q. La Nina ला निना म्हणजे काय?

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना (La Nina) असे म्हणतात.

Q. ढगफुटीसारखा पाऊस का कोसळतोय? त्यामागे काय कारण?

ग्लोबल वॉर्मिंग अथवा क्लायमेट चेंजमुळे अशाप्रकारचा पाऊस पडत आहे. पावसाचे दिवस कमी होताना दिसत आहेत. जो पाऊस विभागला जायचा त्याची विभागणी झाल्याचं दिसत आहे. म्हणजे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पावसाचे दिवस कमी होताना दिसत आहेत. ठराविक कालावधीमध्ये अथवा कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस होत असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे जसे तापमान वाढते तसे हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण वाढलेलं दिसत आहे.

Q. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस का कोसळतोय?

शहरांमध्ये बांधकामांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गाव-खेड्यापेक्षा शहरातील तापमान जास्त असते. त्यामुळे लो प्रेशर बेल्ट निर्माण होतात. अजूबाजूचा भागाकडून वारं शहराकडे येतं. तापमानातही वाढ होते, त्यामुळे शहरात जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे.

Q. परतीचा पाऊस कधी जाणार?

उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे सूर्याचं भासमान सुरु झालं आहे. त्यामुळे लवकरच परतीचा पाऊस संपणार आहे. समुद्रातील तापमान वाढल्यामुळे लो प्रेशर बेल्ट तयार झाले आहेत, त्यामुळे परतीच्या पावसाला उशीर झाला आहे. पुढील सात ते आठ दिवसात परतीचा पाऊस परतेल, असा अंदाज आहे. हमान खात्यानेही त्या पद्धतीचा अंदाज वर्तवला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
Embed widget