एक्स्प्लोर

Maharashtra Rain LIVE : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, पाहा ठिकठिकाणचं अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rain LIVE : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, पाहा ठिकठिकाणचं अपडेट्स एका क्लिकवर

Background

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस  सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय.. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय.. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे

नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

 कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा  ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती

 राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे 104 नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१,  ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या  आहेत.  राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे.
 
गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती आहे. गेले चार दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा पडला आहे.  1986साली अशाच पद्धतीने विनाशकारी महापूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे ताज्या पुरात स्थलांतर करण्यात आले आहे त्यातील तब्बल 34 गावे सिरोंचा तालुक्यातील आहेत. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यात गुंतले आहे. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक  प्रवाहित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद झालेत.

17:03 PM (IST)  •  18 Jul 2022

Nagpur : विद्यूत टावरवर चार दिवसांपासून माकड अडकले

नागपूरः हिंगणा तालुक्यातील माहुरझरी परिसरातीस एका हाय टेंशनलाईन विद्यूत टावरवर चार माकड गेल्या गुरुवार ते शुक्रवारपासून अडकल्याची घटना पुढे आली आहे. टावरच्या खाली असलेल्या भागात गवत आणि पाला पाचोळा असल्याने ते खाऊन परत टावरवर चढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

16:56 PM (IST)  •  18 Jul 2022

Nagpur Rains : सोमवारीही संततधार, पावसाचा जोर मात्र नरमला

नागपूरः गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने रविवारी दिवसभर उसंत घेतल्यानंतर रविवारी रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर नरमल्याचे दिसून आले. महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले.

16:17 PM (IST)  •  18 Jul 2022

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136 मि.मी. सरासरी पाऊस

Wardha Rain : राज्यात वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136  मि.मी. सरासरी पाऊस झाला.जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली आहे.

14:54 PM (IST)  •  18 Jul 2022

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आजची परीक्षा रद्द

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आज दुपारी 2 वाजता होणारी परीक्षा रद्द.. आज होणारी परीक्षा 20 तारखेला होईल.. विद्यापीठानं म्हटलं आहे की, सर्व संबंधितांचे माहितीकरिता सूचित करण्यात येते की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेकरीता संबंधित परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य होणार नाही. या स्थितीचा विचार करता आज सोमवार दिनांक 18/7/2022 रोजी दुपारी  2 ते 05.45 या कालावधीत होणारी पर्यावरण अभ्यासक्रम विषयाची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सदर विषयाची परीक्षा बुधवार दिनांक 20/07/2022 रोजी दुपारी 02 ते 05.45 या वेळेत संबंधित महाविद्यालयांमध्ये होईल. महाविद्यालयांनी  उपरोक्त वेळापत्रकातील बदलाची माहिती सर्व संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने द्यावी, ही विनंती. तसेच महाविद्यालयांना या विषयाचे प्राप्त झालेले प्रश्नपत्रिकेचे पॅकेट सुरक्षित ठेवावे जेणेकरून प्रश्नपत्रिकेची गोपनीयता बाध्य होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी, सदर प्रश्नपत्रिका दिनांक 20/7/2022 रोजी दुपारी 02.ते 5.45 या वेळेमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन स्तरावरच नियोजित राहील 

 

14:51 PM (IST)  •  18 Jul 2022

इंदोर - अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले

मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतनचे वडील राम गोपाल जांगिड़, राहणार नांगल कला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी, वय 70 वर्ष, निवासी मल्हारगढ़ उदयपूर राजस्थान, 3. प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे, राहणार शारदा कॉलनी, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र, 4. निबाजी यांचे वडील आनंदा पाटील, वय 60 वर्ष राहणार पीलोदा अमळनेर, 5.कमला बाई यांचे पती नीबाजी पाटील वय 55 वर्षे राहणार सी. पिलोदा अमळनेर, जळगाव 6. चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमळनेर, जळगाव, (उपरोक्त 1 से 6 पर्यंतचे मृतकांची ओळख आधारकार्डद्वारे केलेली आहे, 7. श्रीमती अरवा यांचे पती मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे राहणार मूर्तिजापूर, अकोला यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर, इंदौर यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे तसेच मृतांमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.

याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटायची बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.

अपघातस्थळी बचाव कार्य सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पूलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257- 2223180, 0257- 2217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget