एक्स्प्लोर

Maharashtra Rain LIVE Updates : राज्यभरात पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग; पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Rain LIVE Updates : रायगड, रत्नागिरी पुणे साताऱ्याला रेड, मुंबई ठाणे आणि पालघर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, राज्यभर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

LIVE

Key Events
Maharashtra Rain LIVE Updates : राज्यभरात पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग; पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Background

Maharashtra Heavy Rain Alert : काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. हवामान विभागानं (India Meteorological Department, IMD) पुढच्या 5 दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश (Flood) परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्यानं नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. 

दरम्यान, सध्या राज्यातील विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मान्सूनची सक्रियता वाढल्यानं पावसाची कोसळधार 

मान्सून देशाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे आणि त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेस स्थित आहे. यासोबतच उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्रही कायम आहे. तसेच पूर्व-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्राच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 3.1 किमी आणि 5.8 किमी दरम्यान Cyclonic Circulation आहे. म्हणूनच या हवामान हालचालींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. 

17:57 PM (IST)  •  08 Aug 2022

वाशीम जिल्ह्यात  जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत, अनेक गावांचा  संपर्क तुटला  

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 27.4  मी. मी पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यातील नदी काठी असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. 

वटफळ, मेंद्रा, गोस्ता, रूई, उमरा समशोद्दिन, तोंडगाव, केकतउमरा,  रिठद,  अमानावाडी खेर्डा  बोरी वारा,  जहागीर , सावली   या  सर्व गावांचा काही काळ संपर्क तुटला  होता.  प्रशासनाने  या सर्व गावांना  धोक्याचा इशारा दिला असून वाहत्या पाण्यातून प्रवास करू नये अशा सूचना दिल्या आहेत.  पावसाने  शेकडो एकर पिकांचं नुकसान झालं आहे. 

17:40 PM (IST)  •  08 Aug 2022

Aurangabad: जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले, 10 दरवाज्यातून 5 हजाराने विसर्ग

Aurangabad News: जायकवाडी धरणात येणारी आवक घटल्याने गेल्या आठवड्यात बंद करण्यात आलेले जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान एकूण 10 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले असून, त्यातून एकूण 5 हजार 240  क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर सोबतच जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक असा विसर्ग सरू असल्याने सद्या जायकवाडीतून एकूण 6 हजार 829 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

16:14 PM (IST)  •  08 Aug 2022

महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागाला कोणता अलर्ट?

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
कोणत्या भागाला कोणता अलर्ट?
 
कोकण
 
रेड अलर्ट : पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 
 
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग 
 
मध्य महाराष्ट्र 
 
रेड अलर्ट : पुणे, कोल्हापूर, सातारातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 
 
ऑरेंज अलर्ट : नाशिकमधील घाट परिसरात अतिमुसळधारेचा इशारा 
 
यलो अलर्ट : नंदुरबारमधील घाट परिसरात मुसळधार, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार 
 
मराठवाडा
 
ऑरेंज अलर्ट : नांदेड, हिंगोली, परभणी 
 
यलो अलर्ट : जालना, बीड, लातूर 
 
विदर्भ 
 
रेड अलर्ट : गडचिरोलीत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 
 
ऑरेंज अलर्ट : भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर 
 
यलो अलर्ट : अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
16:08 PM (IST)  •  08 Aug 2022

अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा काटेपूर्णा धरणाचे दहाही दरवाजे दोन फुटांनी उघडले

Akola Katepurna Dam : अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महान येथील काटेपूर्णा धरणाचे दहाही दरवाजे दोन फुटांनी उघडले आहेत. प्रकल्पातून 442 घनसेंटीमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..

15:32 PM (IST)  •  08 Aug 2022

मुंबई-गोवा महामार्गावर लांज्यातील अंजणारी पुलावरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात आता सर्व दूर पावसाने धुंवाधार बॅटिंग केली आहे. त्यामुळे इथले नदी, ओहळ ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी नदीकाठच्या शिवारात आणि लोकवस्तीत देखील शिरत आहे. लांजा, रत्नागिरी, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे असलेल्या अंजणारी पुलावरील वाहतूक जड वाहनांसाठी सध्याच्या घडीला बंद करण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांना या ठिकाणावरुन पुढे जाण्यास परवानगी आहे. काजळी नदी सध्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यातABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Embed widget